ICC World Cup 2019 : भारत-इंग्लंड सामन्यात कोणते विक्रम तुटतील, हे वाचा!

भारत आणि इंग्लंड या प्रबळ दावेदारांमध्ये रविवारी महामुकाबला होणार आहे. भारतीय संघ सध्या गुणतालिकेत दुसऱ्या, तर इंग्लंड चौथ्या क्रमांकावर आहे. उपांत्य फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी भारतीय संघाला एक विजय पुरेसा आहे, तर इंग्लंडला सर्व सामने जिंकावे लागणार आहेत. त्यामुळे हा सामना इंग्लंडसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. भारत-इंग्लंड यांच्यांत आतापर्यंत 99 सामने झाले आहेत. त्यापैकी भारताने 53, तर इंग्लंडने 41 सामने जिंकले आहेत. उभय संघात दोन सामने बरोबरीत सुटले, तर तीन सामने अनिर्णीत राहीले. वर्ल्ड कप स्पर्धेत ते संघ सातवेळा समोरासमोर आले आणि त्यात दोघांनी प्रत्येकी तीन विजय मिळवले आहेत. यापैकी इंग्लंडमध्ये खेळलेल्या तीन पैकी दोन लढती भारताने जिंकल्या आहेत.

2008मध्ये उभय संघातील सामन्यात भारताने कुटलेल्या 5 बाद 387 धावा ही सर्वाधिक धावा आहे

उभय संघांतील सामन्यांत सर्वाधिक 1523 धावा करण्याचा विक्रम भारताच्या युवराज सिंगच्या नावावर आहे

2011च्या लढतीत इंग्लंडच्या अँड्य्रू स्ट्रॉने 158 धावा केल्या होत्या, उभय संघांमधील ही सर्वोत्तम वैयक्तीक खेळी आहे

भारत आणि इंग्लंड यांच्यात मिळून 43 शतकं ठोकली गेली आहेत

उभय संघात सर्वाधिक 4 शतकं करण्याचा मान युवराज सिंगच्या नावावर आहे

राहुल द्रविड व सुरेश रैना यांच्या नावावर प्रत्येकी 11 अर्धशतकी खेळी आहेत.

महेंद्रसिंग धोनीनं इंग्लंडविरुद्ध 33 षटकार खेचले आहेत आणि दोन्ही देशांतील फलंदाजांत ही सर्वोत्तम खेळी आहे

जेम्स अँडरसन ( 40 ) सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे, तर आशिष नेहराची 23 धावांत 6 विकेट्स ही सर्वोत्तम गोलंदाजी आहे

महेंद्रसिंग धोनीनं इंग्लंडविरुद्ध 55 बळी टिपले आहेत; 2007च्या सामन्यात धोनीनं 6 बळी टिपले होते.