“आता सरसकट युती किंवा आघाडी करणार नाही”; नवाब मलिक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2021 07:36 PM2021-09-08T19:36:49+5:302021-09-08T19:38:36+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक पार पडली.

ncp nawab malik says now there will be no alliance or lead in local bodies election | “आता सरसकट युती किंवा आघाडी करणार नाही”; नवाब मलिक

“आता सरसकट युती किंवा आघाडी करणार नाही”; नवाब मलिक

Next

मुंबई: स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मोर्चेबांधणीला आतापासूनच सुरुवात झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. काँग्रेसने स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत स्वबळाचा नारा दिलेला असताना आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनीही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत सरसकट युती किंवा आघाडी करणार नाही, असे स्पष्ट केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक पार पडली. (ncp nawab malik says now there will be no alliance or lead in local bodies election)

“मी तसं म्हणालेच नाही”; तिसऱ्या लाटेच्या वक्तव्यावरुन किशोरी पेडणेकरांचा यू-टर्न

या बैठकीला राष्ट्रवादीचे सर्व मंत्री, खासदार, आजी-माजी आमदार आणि विधानसभा निवडणुकीत तिकिट दिलेले ११४ उमेदवार उपस्थित होते. यावेळी पवारांनी सर्वांकडून मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला. यानंतर बोलताना नवाब मलिक म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत कुणाशीही सरसकट आघाडी किंवा युती केली जाणार नाही. स्थानिक परिस्थिती पाहून निर्णय घेण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.  

“बेळगावात संजय राऊतांच्या अहंकाराचा पराभव, मराठी माणसाचा नाही”; फडणवीसांचे प्रत्युत्तर

आम्ही ओबीसींना पूर्ण न्याय देऊ

ओबीसी आरक्षणाबाबतचा डेटा वेळेत मिळाला नाही आणि निवडणुका लागल्या तरी आम्ही ओबीसींना पूर्ण न्याय देऊ. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ज्या ठिकाणी ओबीसींसाठी जागा आरक्षित होत्या त्या ठिकाणी ओबीसीच उमेदवार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चिपी विमानतळाला आघाडी सरकारच्या काळात मंजुरी मिळाली आहे. तेव्हा भाजप विरोधात होता. त्याचे काम आमच्या काळातील आहे. भाजपने उगाच‌ याचे श्रेय घेऊ नये, असा टोलाही त्यांनी लगावला.

मोदी सरकारची ‘या’ कंपनीशी सेटलमेंट; हजारो कोटींच्या मोबदल्यात सर्व खटले घेणार मागे!

दरम्यान, परमबीर सिंग यांच्या माध्यमातून अनिल देशमुखांच्याविरोधात घटनाक्रम घडवण्यात आला आहे. परमबीर सिंग यांना वाचवण्यासाठी NIA ने त्यांना आश्वासित केले. त्यामुळे NIA च्या चार्जशीटमध्ये परमबीर सिंग यांना आरोपी करण्यात आलेले नाही. त्यांना वाचवण्यासाठी अनिल देशमुख यांच्यावर खोटे आरोप करण्याचे कटकारस्थान भाजपच्या माध्यमातून झाले, असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.
 

Web Title: ncp nawab malik says now there will be no alliance or lead in local bodies election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.