Join us  

श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटीत भारताच्या विजयाची संधी हुकली

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2017 10:23 PM

Open in App
1 / 6

कोलकाता : अंधुक प्रकाशाच्या जोरावर श्रीलंकेच्या संघाने कोलकाता कसोटीत आपला पराभव टाळला.

2 / 6

अखेरच्या दिवशी रंगतदार अवस्थेत पोहोचलेला भारत-श्रीलंका कसोटी सामना अखेर अनिर्णित राहिला. दुसऱ्या डावात भारताने श्रीलंकेसमोर विजयासाठी 231 धावांचे आव्हान ठेवले होते.

3 / 6

विराट कोहलीच्या शतकाच्या आधारावर भारताने दुसऱ्या डावात 352 धावांवर आपला डाव घोषित केला. विराट कोहलीने दुसऱ्या डावात 104 धावांची शतकी खेळी केली.

4 / 6

अखेरच्या दिवशी श्रीलंकेला उरलेली दोन सत्र फलंदाजी करणे भाग होते. त्यामुळे कोलकाता कसोटी रंगतदार अवस्थेत पोहचली.

5 / 6

भारतीय गोलंदाजांनी भेदक मारा करुन भारताचा विजय दृष्टीपथात आणला होता.

6 / 6

पण, ऐनवेळी अपु-या प्रकाशामुळे पंचांनी खेळ थांबवण्याचा निर्णय घेतला आणि भारताच्या विजयाची संधी हुकली. त्यावेळी श्रीलंकेच्या सात बाद 75 धावा झाल्या होत्या.