Join us  

वेस्ट इंडिजला पराभूत करत भारताने रचले नवे विक्रम, कोणते ते पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2019 7:23 PM

Open in App
1 / 7

भारताने वेस्ट इंडिजवर 2-0 असा दमदार विजय मिळवला. या विजयामुळे भारताने बरेच विक्रम नोंदवले आहेत.

2 / 7

विराट कोहलीचा हा 28वा विजय ठरला. भारताकडून आतापर्यंत सर्वाधिक कसोटी विजयांचा विक्रम आता कोहलीच्या नावावर आहे.

3 / 7

या सामन्यात बुमराने हॅट्रिक नोंदवत इतिहास रचला. वेस्ट इंडिजमध्ये हॅट्रिक मिळवणारा बुमरा हा पहिलाच भारतीय गोलंदाज ठरला.

4 / 7

भारताकडून हनुमा विहारीने पहिल्या डावात शतक तर दुसऱ्या डावात अर्धशतक झळकावले.

5 / 7

वेस्ट इंडिजवर 2-0 असा मालिका विजय मिळवत भारताने विश्व अजिंक्यपद कसोटी स्पर्धेत 120 गुणांसह अव्वल स्थान पटकावले आहे.

6 / 7

या सामन्यात भारताच्या चारही गोलंदाजांनी दमदार कामगिरी केली. जसप्रीत बुमरा, मोहम्मद शमी, इशांत शर्मा आणि रवींद्र जडेजा यांनी वेस्ट इंडिजच्या फलंदाजांना खेळपट्टीवर जास्त काळ टिकू दिले नाही.

7 / 7

या सामन्यात जीवदानाचा फायदा उचलत वेस्ट इंडिजच्या ब्रुक्सने अर्धशतक झळकावले. या सामन्यात त्यांच्या संघाकडून हे एकमेव अर्धशतक पाहायला मिळाले.

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजविराट कोहली