Join us  

भारताने श्रीलंकेविरुद्ध दुस-या कसोटी सामन्यात मिळवला दणदणीत विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 11:37 PM

Open in App
1 / 5

नागपूर - भारताने श्रीलंकेविरुद्ध दुस-या कसोटी सामन्यात दणदणीत विजय मिळवला. एक डाव आणि 239 धावांनी भारताने हा सामना जिंकला.

2 / 5

श्रीलंकेचा दुसरा डाव अवघ्या 166 धावात संपुष्टात आला. कर्णधार चंडीमलचा (61) अपवाद वगळता श्रीलंकेचे अन्य फलंदाज सपशेल अपयशी ठरले.

3 / 5

तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

4 / 5

कालच्या 1 बाद 11 वरुन श्रीलंकेने डाव पुढे सुरु केल्यानंतर ठराविक अंतराने श्रीलंकेचे फलंदाज बाद झाले.

5 / 5

शंभर धावात श्रीलंकेचा निम्मा संघ तंबूत परतला होता. अखेरच्या षटकांमध्ये लकमलने थोडाफार प्रतिकार केला.

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघक्रिकेट