भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेवर विराट सेनेचा कब्जा, भारतानं मिळवला शानदार विजय

पांड्या 78 धावा काढून बाद झाला असून, पांड्याला मॅन ऑफ द मॅच या किताबानं गौरवण्यात आलं आहे. (फोटो सौजन्य- बीसीसीआय)

जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेवरही सहजपणे कब्जा मिळवला आहे.

रविवारी झालेल्या तिसऱ्या वनडेत विराट कोहलीच्या भारतीय संघाने 47.5 षटकांत ऑस्ट्रेलियावर 5 गडी राखून सहज विजय मिळवला आणि पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे.

रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणेची शतकी भागीदारी आणि हार्दिक पांड्याच्या फटकेबाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 294 धावांच्या आव्हानाचा भारताने 48 षटकांतच फडशा पाडला.

मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे यांनी भारताला दमदार सुरुवात करून दिली. रोहित आणि रहाणेने आक्रमक अर्धशतके फटकावताना भारताला 139 धावांची सलामी दिली