IND vs SA, 3rd Test Updates : कोहलीचं धडाकेबाज पुनरागमन, पण द.आफ्रिकेविरुद्ध ठोकलं कारकिर्दीतलं दुसरं सर्वात धीमं अर्धशतक

India vs South Africa, 3rd Test Updates : विराट कोहली ( Virat Kohli) आणि चेतेश्वर पुजारा यांच्या योगदानाच्या जोरावर टीम इंडिया पहिल्या डावात २२३ धावा करू शकली.

India vs South Africa, 3rd Test Updates : विराट कोहली ( Virat Kohli) आणि चेतेश्वर पुजारा यांच्या योगदानाच्या जोरावर टीम इंडिया पहिल्या डावात २२३ धावा करू शकली. १६७ धावांवर भारताची पाचवी विकेट पडली आणि त्यानंतर उर्वरित निम्मा संघ ५६ धावांवर माघारी परतला.

कागिसो रबाडा व मार्को जॅन्सेन यांनी टीम इंडियाचा पहिला डाव गुंडाळला. कंबरेत उसण भरल्यामुळे दुसरा सामना मुकलेल्या विराटनं दमदार कमबॅक केले.

त्याच्या खेळात कमालीची एकाग्रता दिसली आणि बाहेर जाणाऱ्या चेंडूशी छेडछाड करण्याचा मोह त्यानं कटाक्षानं टाळला. महान फलंदाज सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनीही त्याचे कौतुक केले. पण, अन्य फलंदाजांनी निराश केलं.

दरम्यान, १५८ चेंडूंचा सामना करत कोहलीनं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेतील पहिलं अर्धशतक ठोकलं. परंतु हे त्याच्या टेस्ट करिअरमधील दुसरं सर्वात धीमं अर्धशतक ठरलं. विराट कोहलीनं यादरम्यान ७ चौकार आणि १ षटकार लगावला.

विराटनं यापूर्वी इंग्लंडविरोधात २०१२/१३ मध्ये नागपुरात १७१ चेंडू खेळत आपल्या टेस्ट करिअरचं सर्वात धीमं अर्धशतक ठोकलं होतं. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केप टाऊन कसोटी सामन्यात त्यानं १५८ चेंडूंमध्ये अर्धशतक ठोकलं. हे त्याच्या करिअरमधील दुसरं सर्वात धीमं अर्धशतकं ठरलंय.

ऑस्ट्रेलियाविरोधात अॅडलेड येथे २०२०-२१ मध्ये त्यानं १२३ चेंडूंचा सामना करत अर्धशतक ठोकलं होतं. हे विराटच्या करिअरमधील तिसरं धीमं अर्धशतक ठरलंय. तर चौथं सर्वात धीमं अर्धशतक त्यानं याच कालावधीत इंग्लंडविरोधात ठोकलं होतं.

पहिल्या डावात लोकेश व मयांक यांनी निराश केलं. राहुल व मयांक यांनी अनुक्रमे १२ व १५ धावा केल्या आणि भारताला ३३ धावांवर दोन धक्के बसले. पुजारा व विराट यांनी चांगला खेळ करून संघाचा डाव सावरला.

विराटच्या कव्हर ड्राईव्हनं साऱ्यांची वाहवाह मिळवली. तर पुजारानं ७७ चेंडूंत ७ चौकारांसह ४३ धावा केल्या. अजिंक्य रहाणे पुन्हा अपयशी ठरला. विराटनं रिषभ पंतला मार्गदर्शन करताना संघाचा डोलारा सावरला.

रिषभही संयमानं खेळताना दिसला. परंतु आफ्रिकेच्या गोलंदाजांनी डाव साधला. त्यांनी रणनिती आखून पंतला (२७) माघारी पाठवले. दरम्यान, विराटनं कसोटी क्रिकेटमधील २८ वे अर्धशतक पूर्ण करताना जबरदस्त पुनरागमन केलं.