Join us  

भारताच्या अंडर-19 टीमचा विश्वविजयाचा चौकार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2018 2:18 PM

Open in App
1 / 6

डावखुरा फलंदाज मनजोत कालराच्या नाबाद 101 धावांच्या शतकी खेळीच्या बळावर भारताने अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियावर आठ विकेट राखून विजय मिळवत चौथ्यांदा अंडर -19 वर्ल्डकप जिंकला.

2 / 6

फायनलमध्ये रुबाबात दाखल झालेल्या भारताने शेवटच्या सामन्यातही तोच रुबाब कायम राखत ऑस्ट्रेलियाचे 217 धावांचे लक्ष्य आरामात पार केले.

3 / 6

मोहम्मद कैफ, विराट कोहली, उनमुक्त चांद यांच्यानंतर आता पृथ्वी शॉ च्या नेतृत्वाखाली भारताने चौथ्यांदा वर्ल्डकप जिंकला.

4 / 6

पृथ्वी शॉ आणि शुभमन गिल बाद झाल्यानंतर हार्विक देसाई आणि मनजोत कालराने आणखी पडझड होऊ न देता विजयावर शिक्कामोर्तब केले.

5 / 6

न्यूझीलंडमध्ये भारताने अंडर-19 वर्ल्डकप जिंकल्यानंतर भारताच्या वेगवेगळया भागात जोरदार सेलिब्रेशन सुरु आहे.

6 / 6

अंडर-19 संघातील प्रत्येक खेळाडूला बीसीसीआयने 30 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

टॅग्स :भारत वि. ऑस्ट्रेलिया 19 वर्षांखालील विश्वचषक अंतिम लढत