Join us  

VIDEO - पाहा रिसेप्शन सोहळयात शाहरुख खानने विराट-अनुष्कासोबत केला डान्स

क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचा बहुचर्चित रिसेप्शन सोहळा काल मुंबईत पार पडला.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2017 1:14 PM

Open in App
ठळक मुद्देविरूष्काच्या मुंबईतील या रिसेप्शनमध्ये एका पाहुण्याने सगळ्यांचं लक्ष वेधलं ते म्हणजे टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी.

मुंबई - क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचा बहुचर्चित रिसेप्शन सोहळा काल मुंबईत पार पडला. लग्नानंतरचे हे दुसरे रिसेप्शन होते. याआधी 21 डिसेंबरला दिल्लीत रिसेप्शन झाले होते. लोअर परेलच्या सेंट रेगिस या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये झालेल्या रिसेप्शन सोहळयामध्ये बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खानने रंग भरले. 

विरुष्काला शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या शाहरुखने विराट आणि अनुष्कासोबत त्याच्या गाजलेल्या छय्या-छय्या, प्रिटी वुमन या गाण्यांवर ठेका धरला. दिल्लीतील रिसेप्शनला जवळचा मित्रपरिवार आणि कुटुंबिय उपस्थित होते. पण मुंबईतील रिसेप्शनला क्रिकेटपटू आणि बॉलिवूडची मांदियाळी लोटली होती. 

 

मतभेद विसरुन आले अनिल कुंबळे विरूष्काच्या मुंबईतील या रिसेप्शनमध्ये एका पाहुण्याने सगळ्यांचं लक्ष वेधलं. टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी विरूष्काच्या रिसेप्शनला हजेरी लावली होती. टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी अनिक कुंबळेंना न ठेवण्याची विराटची इच्छा होती. ज्यामुळे विराट व अनिल कुंबळे या दोघांमध्ये मतभेद झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. क्रिकेटच्या मैदानावर दोघांमध्ये मतभेद असले तरी ते मतभेद बाजूला ठेवून अनिल कुंबळे यांनी विरूष्काच्या रिसेप्शनला हजेरी लावली. अनिल कुंबळे एक वर्ष टीम इंडियाचे प्रमुख प्रशिक्षक होते. कुंबळे यांचे प्रशिक्षक पदाचा करार वाढवला जाणार होता, पण विराटबरोबर असेलल्या मतभेदामुळे बीसीसीआयने त्यांची पुन्हा प्रशिक्षकपदी नियुक्ती केली नसल्याची चर्चा आहे.   

इटलीत 11 डिसेंबरला खासगी सोहळयामध्ये अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटपटू विराट कोहली विवाहबद्ध झाले. या लग्नाला ज्यांना हजर राहता आले नाही त्यांच्यासाठी आज मुंबईमध्ये दुसरा रिसेप्शन सोहळा आयोजित करण्यात आला होता.

निमंत्रण - चाहत्यांमध्ये विरुष्का म्हणून लोकप्रिय असलेल्या या जोडीने लग्नासाठी पर्यावरण अनुकूल इको फ्रेंडली थीम ठेवली आहे. विराट आणि अनुष्काने पर्यावरण अनुकूल लग्न पत्रिका बनवल्या आहेत. लग्नाच्या निमंत्रणपत्रिकेवर झाडाची पाने आहेत.  

टॅग्स :विराट अनुष्का लग्न