Join us  

खरमरीत टीकेनंतरही रायुडूवर कारवाई नाही: बीसीसीआय

विश्वचषकासाठी निवडलेल्या १५ सदस्यीय भारतीय संघात निवड समितीने अंबाती रायुडूला डावलले.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 4:34 AM

Open in App

नवी दिल्ली: विश्वचषकासाठी निवडलेल्या १५ सदस्यीय भारतीय संघात निवड समितीने अंबाती रायुडूला डावलले. रायुडू या गोष्टीमुळे निराश झाला आणि त्यानंतर त्याने संघ निवडीवर टिष्ट्वटरवरून खरमरीत टीका केली.‘आता थ्री-डी गॉगल घालून मी विश्वचषक पाहणार ,’ अशी टीका करताना रायुडूने विश्वचषकातील संघात माझी निवड केली नाही, पण मी विश्वचषकात खेळतो आहे, हा आभास निर्माण करण्यासाठी आता थ्री-डी गॉगल घालून विश्वचषक पाहणार असल्याचे या पोस्टच्या माध्यमातून म्हटले होते. रायुडूच्या या बोचऱ्या टीकेनंतरही त्याच्यावर कुठलीही कारवाई करणार नसल्याचे बीसीसीआयने बुधवारी स्पष्ट केले.

टॅग्स :बीसीसीआयवर्ल्ड कप २०१९