Join us  

ज्यादा दिमाग मत लगाओ! 'गब्बर'चा शाहिद आफ्रिदीला सज्जड दम, असं नेमकं काय घडलं?

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील राजकिय संबंध कसे आहेत, हे वेगळं सांगायला नको.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 10:48 AM

Open in App

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील राजकिय संबंध कसे आहेत, हे वेगळं सांगायला नको. पुलवामा दहशतवादी हल्ला आणि काश्मीर मुद्दावरून या देशांतील संबंध अधिक ताणले गेले आहेत. पाकिस्तानकडून सातत्यानं काश्मीर मुद्दा उपस्थित करून भावना भडकावण्याचं काम सुरू आहे. जम्मू-काश्मीरमधूल कलम 370 आणि कलम 35A हटवल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा तीळपापड झाला होता. पाकिस्तानचे क्रिकेटपटूंनीही अकलेचे तारे तोडले आहेत. त्यात शाहिद आफ्रिदी आघाडीवर आहे. 

आफ्रिदीनं काश्मीर मुद्यावर नुकतेच एक ट्विट केलं. पण, यावेळी त्याला भारताचा माजी सलामीवर गौतम गंभीरने नाही तर सध्याचा सलामीवीर गब्बर शिखर धवननं धारेवर धरलं. नुकतेच धवननं पाकिस्तानी राजकारण्यांना स्वतःच घर सांभाळा असा सल्ला दिला होता. 33 वर्षीय धवन म्हणाला होता की,''जर कोणी आमच्या देशाबद्दल वाईट बोलत असेल, तर त्याच्या विरोधात आम्ही नक्कीच उभे राहू. आम्हाला बाहेरच्यांच्या सल्ल्याची आवश्यकता नाही. पहिले तुमच्या देशातील समस्या सोडवा आणि नंतर दुसऱ्यांच्या घरात डोकवा. जिनके घर शीशे के होते हैं, वे दूसरों के घरों पर पत्थर नहीं फेंकते.'' 

आता गब्बरनं आफ्रिदीच्या ट्विटचा समाचार घेतला आहे. आफ्रिदीनं ट्विट केलं की,''भारतव्याप्त काश्मीरमधली परिस्थिती दिवसेंदिवस भयानक आणि चिंताजनक होत चालली आहे. निरापधारांना मारले जात आहे. यूएन आणि अन्य आंतरराष्ट्रीय संस्था का डोळे झाकून बसल्या आहेत, हेच कळत नाही.''  आफ्रिदीच्या या ट्विटला गब्बरने उत्तर दिले. त्यानं लिहिले,''प्रथम स्वतःच्या देशातील हालत सुधरा. तुमचे विचार तुमच्याकडेच ठेवा. आमच्या देशात आम्ही जे करतोय ते चांगलेच आहे आणि भविष्यात काय करायचेय हेही आम्हाला चांगले माहित आहे. जास्त डोकं लावू नका.'' भारतीय गोलंदाज इशांत शर्मानेही आफ्रिदीचा समाचार घेतला.  

टॅग्स :शिखर धवनशाहिद अफ्रिदीपुलवामा दहशतवादी हल्लाकलम 370