ठळक मुद्देजेमिमा रॉड्रीग्जला स्पर्धेतील सर्वोत्तम फलंदाजाचा मान.
कोलंबो : भारतीय महिला क्रिकेट संघाने पाच सामन्यांच्या ट्वेंटी-20 मालिकेत श्रीलंकेवर 4-0 असा विजय मिळवला. मंगळवारी झालेल्या अंतिम सामन्यात भारताने 51 धावांनी विजय मिळवला. मुंबईकर जेमिमा रॉड्रीग्जने पुन्हा एकदा ( 46) दमदार फटकेबाजी केली. तिला हरमनप्रीतने 63 धावांची खेळी करताना चांगली साथ दिली. भारताच्या 156 धावांच्या प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संपूर्ण संघ 17.4 षटकांत 105 धावांवर तंबूत परतला.