Join us  

आता ठरलं; अटक वॉरेंटनंतर मोहम्मद शमी 'या' दिवशी भारतात येणार

शमीला 2 सप्टेंबरला न्यायालयाने नोटीस बजावली होती. त्यावेळी त्याला 15 दिवसांमध्ये सरेंडर व्हायला सांगितले होते. त्यामुळे शमीला 17 सप्टेंबरपर्यंत न्यायालयापुढे हजर राहावे लागणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2019 8:16 PM

Open in App

मुंबई : आपल्याविरोधात अटक वॉरंट निघाल्यावर भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी वेस्ट इंडिजहून थेट भारतात आला नाही. वेस्ट इंडिजवरून त्याने थेट अमेरिका गाठली आणि आता तो भारतात कधी येणार, यावर चर्चा व्हायला सुरु झाली. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शमी 'या' दिवशी भारतात येणार आहे.

भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीविरोधात अटक वॉरेंट 2 सप्टेंबरला काढण्यात आले आहे. त्यावेळी शमीला सरेंडर होण्यासाठी पंधरा दिवासांचा अवधी देण्यात आला होता. अटक वॉरेंट निघाल्यावर शमी हा वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर होता. पण हा दौरा संपल्यावरही शमी भारतामध्ये परतलेला नाही. शमी अटक वॉरेंटला कसा सामोरा जातो, याची उत्सुकता चाहत्यांना आहे.

अटक वॉरेंट निघाल्यावर शमी हा वेस्ट इंडिजमधून थेट भारतामध्ये दाखल होईल आणि कोर्टामध्ये सादर होईल, असेच साऱ्यांना वाटले होते. पण तसे घडताना मात्र दिसत नाही. वेस्ट इंडिजचा दौरा संपल्यावर शमी थेट अमेरिकेला रवाना झाला आहे. याबाबतची माहिती त्याने बीसीसीआयला दिली आहे. 

शमीला 2 सप्टेंबरला न्यायालयाने नोटीस बजावली होती. त्यावेळी त्याला 15 दिवसांमध्ये सरेंडर व्हायला सांगितले होते. त्यामुळे शमीला 17 सप्टेंबरपर्यंत न्यायालयापुढे हजर राहावे लागणार आहे. त्यामुळे शमी 17 सप्टेंबरपर्यंत भारतामध्ये येणार का, या सध्याच्या घडीला मोठा प्रश्न आहे.

शमी सध्या अमेरिकेमध्ये आहे. अमेरिकेमधून शमी कदाचित 11 सप्टेंबरला भारतासाठी रवाना होणार आहे. त्यानुसार शमी 12 सप्टेंबरला भारतात दाखल होऊ शकतो, अशी माहिती बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्यांनी दैनिक जागरणच्या संकेतस्थळाला दिली आहे.

शमी भारतामध्ये नसला तरी तो आपल्या वकिलांच्या संपर्कामध्ये आहे. त्याचबरोबर बीसीसीआयदेखील शमीच्या पाठिशी आहे. जोपर्यंत आपण आरोपपत्र पाहत नाही तोपर्यंत शमीवर कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही, अशी भूमिका बीसीसीआयने घेतली आहे. त्यामुळे आता या अटक वॉरेंटविरोधात शमी काय पाऊल उचलतो, याकडेच साऱ्यांचे डोळे लागले आहेत.

मोहम्मद शमीविरुद्ध कोलकाता अलिपोर कोर्टाने अटर वॉरेंट काढले आहे. पण बीसीसीआय मात्र शमीच्या पाठीमागे ठामपणे उभी राहिली आहे. सध्याच्या घडीला शमी हा वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर आहे. पण पोलिसांनी त्याला पंधरा दिवसांमध्ये हजर राहण्याचे आदेश अलिपोर कोर्टाने दिले आहेत.

जहाँने पश्चिम बंगालच्या अलिपोर कोर्टात शमी आणि त्याच्या कुटुंबियांविरुद्ध घरगुती हिंसाचाराची केस दाखल केली. या नव्या केसमध्ये हसीन जहाँने शमीवर भत्ता आणि उपचाराचा खर्च न दिल्याचा आरोप केला. हसीन जहाँच्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, हसीनने मोहम्मद शमी, त्याची आई, मोठा भाऊ आणि वहिनीविरोधात घरगुती हिंसाचाराची केस दाखल केली. तसेच हसीन जहाँने दर महिन्याला १० लाख रुपये भत्त्याची मागणी केली होती. हसीनने ७ लाख रुपये कुटुंबाचा मेंटेनन्स आणि ३ लाख रुपये मुलीसाठी अशी १० लाखांची मागणी केली होती. केस दाखल केल्यानंतर हसीनने कोर्टात सादर झाला नसल्याचा आरोप केला. एप्रिल २०१९ मध्ये पतीच्या घरी जाऊन गोधळ घातल्याप्रकरणी हसीनला उत्तर प्रदेशातील अमरोही येथे पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर तिची जामिनावर सुटका झाली होती.

टॅग्स :मोहम्मद शामीबीसीसीआय