Join us  

IPL 2021; Virat Kohli: "हरकत नाही भावा, आपण टी-२० वर्ल्ड कप जिंकू"; कॅप्टन कोहलीला चाहत्यांचा 'विराट' सपोर्ट

RCBच्या या पराभवानंतर अनेकांनी टीका केली, पण विराट  कोहलची कट्टर समर्थक RCBच्या कर्णधाराला धीर द्यायला धावले. आयपीएल ट्रॉफी नाही मिळाली तर काय झालं, आपण ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकू, असा धीर अनेकांनी विराटला दिला.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2021 12:38 PM

Open in App

कर्णधार म्हणून विराट कोहलीचा ( Virat Kohli) इंडियन प्रीमिअर लीगमधील प्रवास सोमवारी संपला. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ( RCB) संघाचे ९ वर्ष त्यानं नेतृत्व सांभाळले आणि २०१६मध्ये जेतेपदाच्या जवळ जाऊन त्यांना माघारी फिरावे लागले. यंदा हा दुष्काळ संपवण्याचा निर्धार करून RCBचे खेळाडू मैदानावर उतरले, परंतु कोलकाता नाइट रायडर्सनं ( KKR) त्यांची ही घोडदौड थांबवली. १४० सामने आयपीएलमध्ये एकाच संघाचे नेतृत्व करूनही एकही जेतेपद नसलेला विराट हा IPL इतिहासातिल पहिलाच कर्णधार ठरला. त्यामुळेच कालच्या सामन्यानंतर वार्तांकन करताना इंग्रजी वृत्तपत्रांनी, ''King Without Title''असे मथळे दिले. 

२०११ ते २०२१ या कालावधीत विराट कोहलीनं रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाचे १४० सामन्यांत नेतृत्व केले आणि त्यापैकी ६६ सामने जिंकले, तर ७० मध्ये पराभव पत्करला. १३९ डावांमध्ये त्यानं ५ शतकं व ३५ अर्धशतकांसह ४१.९९च्या सरासरीनं ४८७१ धावा केल्या. RCBच्या या पराभवानंतर अनेकांनी टीका केली, पण विराट  कोहलची कट्टर समर्थक RCBच्या कर्णधाराला धीर द्यायला धावले. आयपीएल ट्रॉफी नाही मिळाली तर काय झालं, आपण ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकू, असा धीर अनेकांनी विराटला दिला. १७ ऑक्टोबरपासून ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात  होणार आहे आणि २४ ऑक्टोबरला भारताचा पहिलाच मुकाबला पाकिस्तानविरुद्ध आहे.   आजच्या सामन्यात नाणेफेकीचा कौल बाजूने लागताच विराटनं फलंदाजीचा निर्णय घेतला. पण, ० बाद ४९ वरून RCBची गाडी घसरली ती पुन्हा ट्रॅकवर आलीच नाही. KKRचा कर्णधार इयॉन मॉर्गन यानं गोलंदाजांचा योग्य वापर करून घेताना RCBच्या धावांना लगाम लावला. विराट कोहली ( ३९) आणि देवदत्त पडिक्कल ( २१) हे सलामीवीर वगळले तर RCBचे स्टार आज जमिनीवर आपटले. सुनील नरीननं RCBला मोठे धक्के देताना के भरत, विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स व ग्लेन मॅक्सवेल यांची विकेट घेतली. नरीननं २१ धावांत ४ , तर ल्युकी फर्ग्युसननं ३० धावांत २ विकेट्स घेत RCBला ७ बाद १३५ धावांवर रोखले. 

शुबमन गिल ( २९)  व वेंकटेश अय्यर ( २६) यांनी कोणताही धोका न पत्करता सावध खेळ करून पहिल्या विकेटसाठी ४१ धावा जोडल्या. पण, हर्षल पटेल व युझवेंद्र चहल यांनी KKRला धक्के देण्यास सुरुवात केले. नितीश राणा ( २३) चुकीचा फटका मारून बाद झाला. सुनील नरीननं मैदानावर येताच सलग तीन षटकार खेचून KKRवरील दडपण कमी केलं, परंतु मोक्याच्या वेळेला तोही बाद झाला. मोहम्मद सिराजनं १९व्या षटकात दिलेले दोन धक्के RCBला विजय मिळवून देणारे ठरतात, असे वाटू लागले. पण, इयॉन मॉर्गन व शाकिब अल हसन यांनी संयमी खेळ करताना KKRचा विजय पक्का केला. सिराज, हर्षल व युझवेंद्र यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.

टॅग्स :आयपीएल २०२१रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविराट कोहलीकोलकाता नाईट रायडर्सट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१
Open in App