Join us  

IPL 2019 CSK vs DC Qualifier 2 : मांजरेकरच्या प्रश्नावर कॅप्टन कूल धोनीचं गमतीदार उत्तर

IPL 2019 CSK vs DC Qualifier 2: मुंबई इंडियन्ससोबत जेतेपदाच्या लढतीत कोणता संघ मैदानावर उतरेल याचा फैसला आज होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2019 7:21 PM

Open in App

विशाखापट्टणम, आयपीएल 2019 : मुंबई इंडियन्ससोबत जेतेपदाच्या लढतीत कोणता संघ मैदानावर उतरेल याचा फैसला आज होणार आहे. गतविजेता चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात क्वालिफायर 2 चा सामना आज विशाखापट्टणम येथे रंगत आहे. चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. त्याच्या या निर्णयाने दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरच्या चेहऱ्यावर स्मित हास्य फुलले. त्यालाही प्रथम फलंदाजीच करायची होती आणि मनकवड्या धोनीनं दिल्लीला ही संधी दिली. पण, यावेळी समालोचक संजय मांजरेकरने विचारलेल्या प्रश्नावर कॅप्टन कूल धोनीने दिलेलं उत्तर पाहून सर्वच हसू लागले.आयपीएलमध्ये विजयाचे शतक साजरे करण्यासाठी चेन्नईला केवळ एक विजय हवा आहे. चेन्नईने 163 सामन्यांत 99 विजय मिळवले आहेत आणि त्यांचा विजयाची टक्केवारी ( 61.41%) ही अन्य संघापेक्षा चांगली आहे. त्यामुळे चेन्नईने आज दिल्लीवर विजय मिळवल्यास आयपीएलमध्ये 100 सामने जिंकणारा तो मुंबई इंडियन्सनंतर दुसरा संघ ठरणार आहे. मुंबईने 186 सामन्यात 106 विजय मिळवले आहेत. याच सामन्यात धोनीलाही एक विक्रमाची संधी आहे. या सामन्यात तीन बळी टिपल्यास आयपीएलमध्ये सर्वाधिक बळी टिपणारा यष्टिरक्षकाचा मान त्याला मिळेल. कोलकाता नाईट रायडर्सचा दिनेश कार्तिक 131 बळींसह आयपीएलमध्ये सर्वात यशस्वी यष्टिरक्षक आहे. धोनीच्या नावावर 129 बळी आहेत आणि त्यात 91 झेल व 38 यष्टिचीतचा समावेश आहे.

या सामन्याच्या नाणेफेकीनंतर मांजरेकरने धोनीला विचारले की,महत्त्वाचा टॉस तु जिंकलास? त्यावर धोनी म्हणाला, आता गोलंदाज कशी कामगिरी करतात यावर सर्व अवलंबून आहे.

टॅग्स :आयपीएल 2019चेन्नई सुपर किंग्सदिल्ली कॅपिटल्समहेंद्रसिंग धोनी