रिषभ पंतसाठी भारताच्या संघाचे दरवाजे बंद; कर्णधार कोहली म्हणाला...

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात रिषभ पंत जायबंदी झाला, त्यानंतर तो भारतीय संघाला दिसला नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2020 05:46 PM2020-01-20T17:46:47+5:302020-01-20T17:49:09+5:30

whatsapp join usJoin us
India's team closed its doors for Rishabh Pant; Captain Virat Kohli said ... | रिषभ पंतसाठी भारताच्या संघाचे दरवाजे बंद; कर्णधार कोहली म्हणाला...

रिषभ पंतसाठी भारताच्या संघाचे दरवाजे बंद; कर्णधार कोहली म्हणाला...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देकोहलीनेच याबाबतचे एक वक्तव्य केले आहे.

मुंबई : बऱ्याच संधी देऊनही भारताचा युवा यष्टीरक्षक रिषभ पंत हा सातत्याने नापास होत राहीला. त्याला संघात स्थान देत असल्यामुळे कर्णधार विराट कोहलीवरही टीका होत होती. पण आता तर पंतसाठी संघाचे दरवाजे बंद झाल्याचे समजत आहे. कारण कोहलीनेच याबाबतचे एक वक्तव्य केले आहे.

Related image

न्यूझीलंडच्या दौऱ्यापूर्वी भारताचे तीन खेळाडू जायबंदी झाले होते. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात रिषभ पंत जायबंदी झाला, त्यानंतर तो भारतीय संघाला दिसला नाही. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात सलामीवीर शिखर धवन दुखापतग्रस्त झाला आणि तिसऱ्या सामन्यात त्याला खेळता आले नाही. पण आता तर भारताचा स्टार गोलंदाज जायबंदी झाल्याचे म्हटले जात आहे.

पंत जायबंदी झाल्यानंतर संघात यष्टीरक्षकाला स्थान देण्यात आले नाही. पंतच्या जागी लोकेश राहुलने त्यानंतर भारताच्या यष्टीरक्षणाची जबाबदारी यशस्वीरीत्या पेलली. राहुलने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंचला यष्टीचीत केले आणि त्यानंतर पंतचा पत्ता कट झाल्याचे म्हटले जाऊ लागले.

Image result for pant out of team

कोहली याबाबत म्हणाला की, " यापूर्वी भारतीय संघात राहुल द्रविड यांनी अशीच यष्टीरक्षणाची जबाबदारी सांभाळली होती. जर राहुल यष्टीरक्षण करत असेल तर संघात अतिरीक्त फलंदाज खेळवता येऊ शकतो. त्यामुळे संघाचा समतोलही चांगला राहतो. त्यामुळे हा पर्याय आमच्यासाठी चांगलाच आहे." 

Related image

Web Title: India's team closed its doors for Rishabh Pant; Captain Virat Kohli said ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.