Join us  

India vs West Indies 2nd ODI: धवन दुखापतीतून सावरला, पण आता बॅट झाली जायबंदी

धवनचा खेळ पाहून त्याची बॅट जायबंदी झाली आहे का, असा सवाल चाहते विचारत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2019 8:55 PM

Open in App

पोर्ट ऑफ स्पेन, भारत वि. वेस्ट इंडिज : विश्वचषकातील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात भारताचा सलमीवीर शिखर धवनने शतक झळकावले होते. पण या शतकानंतर मात्र तो दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे धवनला विश्वचषकाला मुकावे लागले होते. पण आता धवन दुखापतीतून सावरला आहे. त्यामुळे त्याला भारतीय संघात स्थान दिले आहे. पण त्याचा खेळ पाहून त्याची बॅट जायबंदी झाली आहे का, असा सवाल चाहते विचारत आहेत.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिन्ही ट्वेन्टी-20 सामन्यांमध्ये धवन खेळला. या तिन्ही सामन्यांत धवनला अनुक्रमे 1, 23 आणि 3 धावा केल्या होत्या. पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताला फलंदाजी करायला मिळाली नव्हती. दुसऱ्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण या सामन्यात धवनला फक्त 2 धावाच करता आल्या. त्यामुळे गेल्या चार सामन्यांमध्ये धवनला एकही चांगली खेळी साकारता आलेली नाही. त्यामुळे धवनच्या बॅटला गंज चढला का, असा सवाल चाहते विचारत आहेत.

विराट कोहलीने रचला इतिहास, बनला क्रिकेट विश्वातील अव्वल फलंदाजभारताचा कर्णधार विराट कोहलीने वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात अर्धशतक झळकावले. ही अर्धशतकी खेळी साकारताना कोहलीने एक इतिहास रचला आहे. ही विक्रमी कामगिरी करणारा तो जगातील अव्वल फलंदाज ठरला आहे.

भारताला दुसऱ्या सामन्यात सलामीवीर शिखर धवनच्या रुपात पहिला धक्का बसला. धवन आऊट झाल्यावर कोहली फलंदाजीला आला आणि आपल्या आक्रमक शैलीत त्याने फटकेबाजी करायला सुरुवात केली. ही फटकेबाजी करताना कोहलीने इतिहास रचला आहे.

कोहलीने या सामन्यात 19 धावा जेवहा केल्या, तेव्हा त्याने इतिहास रचला. कारण त्यावेळी वेस्ट इंडिजविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा कोहली हा अव्वल फलंदाज ठरला. कोहलीने यावेळी पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू जावेद मियांदाद यांना पिछाडीवर सोडले. मियांदाद यांच्या नावावर 1930 धावा होत्या. या धावा त्यांनी 64 डावांमध्ये केल्या होत्या. कोहलीने मात्र हा धावांचा विक्रम मोडीत काढला आहे. हा विक्रम मोडीत काढताना कोहली मियांदाद यांच्यापेक्षी 34 डाव कमी खेळला आहे.

क्विन्सपार्कवर भारतीय संघच आहे किंग; 12 वर्षांपासून आहे अपराजितभारत आणि वेस्ट इंडिज यांच्यांमध्ये आज दुसरा सामना क्विन्स पार्क ओव्हल येथे होणार आहे. पण या क्विन्स मैदानावर भारतीय संघच किंग असल्याचे दिसत आहे. कारण गेल्या 12 वर्षांमध्ये भारतीय संघ या मैदानात एकही सामना गमावलेला नाही. त्याचबरोबर भारताने भारताबाहेर सर्वात जास्त धावसंख्या याच मैदानात रचलेली आहे.

भारताने 2007 साली झालेल्या विश्वचषकात भारत आणि बर्म्युडा यांच्यातील सामना या मैदानात झाला होता. बर्म्युडाने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले होते. भारताने या संधीचा चांगलाच फायदा उचलला होता. भारताने बर्म्युडाविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना 412 धावा केल्या होत्या. या सामन्यात वीरेंद्र सेहवागने 114 धावा केल्या होत्या. त्याचबरोबर सौरव गांगुली, युवराज सिंग आणि सचिन तेंडुलकर यांनी अर्धशतके झळकावली होती.

या मैदानात 23 मार्च 2007 साली भारताला श्रीलंकेडून पराभव पत्करावा लागला होता. हा या मैदानातील भारताचा अखेरचा पराभव होता. कारण यानंतर सात  सामने या मैदानात खेळले गेले आणि एकाही सामन्यांमध्ये भारताला पराभव स्वीकारावा लागला नाही. त्यामुळे गेल्या बारा वर्षांपासून भारतीय संघ या मैदानावर अपराजित आहे.

टॅग्स :शिखर धवनभारत विरुद्ध वेस्ट इंडिज