Join us  

धडा शिकविण्यास भारत सज्ज, द. आफ्रिकेविरुद्ध पहिला सामना आज

विपरीत परिस्थितीत संयम आणि धैर्याचा शानदार परिचय देत तिसरी कसोटी जिंकणारा भारतीय संघ द. आफ्रिकेविरुद्ध उद्या गुरुवारपासून सुरू होत असलेल्या सहा सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात यजमान संघाला नमवित धडा शिकविण्याच्या निर्धारासह उतरणार आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2018 1:37 AM

Open in App

दरबन : विपरीत परिस्थितीत संयम आणि धैर्याचा शानदार परिचय देत तिसरी कसोटी जिंकणारा भारतीय संघ द. आफ्रिकेविरुद्ध उद्या गुरुवारपासून सुरू होत असलेल्या सहा सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात यजमान संघाला नमवित धडा शिकविण्याच्या निर्धारासह उतरणार आहे.२०१९च्या विश्वचषकासाठी १४ महिने शिल्लक आहेत. त्यामुळे भारतीय संघ तयारीचा आढावा घेण्याचाही प्रयत्न करेल. विश्वचषकाआधी भारताला बºयाच मालिका खेळायच्या असल्याने द. आफ्रिकेविरुद्ध सकारात्मक सुरुवात करावी लागेल. सहा वन-डे, शिवाय भारत येथे तीन टी-२० सामने खेळणार असून, त्यानंतर श्रीलंकेत तिरंगी मालिकेत सहभागी होईल. त्यानंतर आयपीएलचे आयोजन असेल. पाठोपाठ इंग्लंड आणि आयर्लंड येथे तीन वन-डे आणि तीन टी-२० सामने खेळायचे आहेत. इंग्लंडमध्ये आॅगस्टमध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिकाही खेळली जाईल. इतक्या सामन्यांनंतर संघ व्यवस्थापनाला विश्वचषकासाठी संघ निवडायचा आहे.भारताचे रेकॉर्ड चांगले नाहीच...भारताला द. आफ्रिकेत याआधी झालेल्या चार द्विपक्षीय वन-डे मालिका जिंकण्यात अपयश आले. याशिवाय संघ येथे दोनदा तिरंगी मालिकाही खेळला. पण दोन्ही वेळा विजेता ठरला तो द. आफ्रिकाच.भारतीय संघ येथे २८ सामने खेळला असून, त्यापैकी केवळ पाच सामने जिंकला. २१ सामन्यांत पराभवाचे तोंड पाहावे लागले. सध्याचा भारतीय संघ हे रेकॉर्ड सुधारण्यास आतूर आहे.पहिला सामना ज्या दरबन शहरात होत आहे, तेथे भारताचे रेकॉर्ड चांगले नाही. १९९२-९३ पासून संघाने येथे जे सात सामने खेळले, त्यापैकी सहा गमविले. एका सामन्याचा निकाल लागला नव्हता. सन २००३च्या विश्वचषकादरम्यान भारताने येथे इंग्लंड आणि केनियाचा पराभव केला. भारताने ही मालिका ४-२ ने जिंकल्यास द. आफ्रिकेकडून अव्वल स्थान हिसकावू शकतो.भारतीय संघ २०१६मध्ये आॅस्ट्रेलियाकडून १-४ ने पराभूत झाल्यानंतर आतापर्यंत द्विपक्षीय मालिकेत ३२पैकी २४ सामने जिंकला आहे. गतवर्षी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात मात्र भारत पाककडून पराभूत झाला होता.पावसाची शक्यता...दरबनची खेळपट्टी हिरवीगार आहे. काल येथे पावसाने हजेरी लावली. सामन्याच्या दिवशीही हवामान खात्याने पावसाची शक्यता वर्तविली आहे. अशा वेळी भारत किती फिरकीपटू खेळवितो हे पाहावे लागेल.अकरा खेळाडूंमध्ये एकाच फिरकी गोलंदाजाला संधी मिळाल्यास कुलदीप यादवला झुकते माप मिळू शकते. डेव्हिड मिलर आणि जेपी ड्यूमिनी यांच्या फटकेबाजीवर नियंत्रण आणणारा गोलंदाज म्हणून कुलदीप उपयुक्त ठरू शकतो.आम्ही गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक प्रयोग केले. विश्वचषक स्पर्धेपूर्वी मर्यादित मालिका शिल्लक राहिल्याने त्यापूर्वी आम्ही सर्व प्रयोग करु इच्छितो. याआधीही मी म्हटले होते की, अजिंक्य रहाणे तिसरा सलामीवीर होऊ शकतो. मात्र, तो २०१५ च्या विश्वचषक स्पर्धेत चौथ्या क्रमांकावर खेळला असल्याने या स्थानासाठी तो प्रबळ दावेदार असेल. तसेच, आमच्याकडे श्रेयस अय्यर आणि मनिष पांड्ये यांचाही पर्याय आहे, परंतु आम्ही केवळ एकाच पक्षाचा विचार क्रु इच्छित नाही.- विराट कोहली, कर्णधार - भारतदक्षिण आफ्रिका दौºयावर येणाºया संघांना येथील परिस्थितीनुसार जुळवून घेण्यास अडचणी होतात. मात्र, माझ्या मते भारताकडे असे खेळाडू आहेत जे कागदावर अत्यंत मजबूत असून आम्हाला आव्हान देऊ शकतात आणि येथे विजयही नोंदवू शकतात. संघ किती शानदार आहे, हे त्यांनी कसोटी मालिकेत दाखवून दिले. त्यामुळे एकदिवसीय मालिकेतही असेच आव्हान मिळण्याची मला खात्री आहे.- फाफ डू प्लेसिस, कर्णधार - दक्षिण आफ्रिकाधोनीला १० हजार धावांचा पल्ला गाठण्याची संधीदक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरु होत असलेल्या मालिकेद्वारे भारताचा स्टार महेंद्रसिंग धोनी याला दोन विक्रम करण्याची संधी आहे. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये १० हजार धावांचा जादुई आकडा पार करण्यासाठी धोनीला केवळ १०२ धावांची आवश्यकता आहे. त्याचवेळी, एकदिवसीय क्रिकेटमध्ये ४०० बळी पूर्ण करण्यासाठीही त्याला केवळ २ बळींची आवश्यकता आहे. धोनीने आतापर्यंत ३१२ सामने खेळताना २६८ डावांमध्ये ५१.५५च्या शानदार सरासरीने ९,८९८ धावा काढल्या आहेत.भारताकडून याआधी सचिन तेंडुलकर (१८,४२६), सौरभ गांगुली (११,३६३) आणि राहुल द्रविड (१०,८८९) यांनी दहा हजार धावांचा पल्ला पार केला आहे. त्याचप्रमाणे यष्टीरक्षणामध्ये धोनीने एकूण २९३ झेल घेताना विक्रमी १०५ यष्टीचीत करताना एकूण ३९८ बळी घेतले आहेत. सर्वाधिक बळी मिळवण्याच्या क्रमवारीत श्रीलंकेचा माजी दिग्गज यष्टीरक्षक कुमार संगाकारा (४७२) आघाडीवर असून त्यानंतर आॅस्ट्रेलियाचा अ‍ॅडम गिलख्रिस्ट (४७२) आणि दक्षिण आफ्रिकेचा मार्क बाऊचर (४२४) यांचा क्रमांक आहे. यानंतर धोनीचा क्रमांक आहे.त्याचवेळी, कर्णधार विराट कोहलीलाही एकदिवसीय क्रिकेटमध्ये १०० षटकार ठोकण्याची कामगिरी करण्याची संधी आहे. यासाठी कोहली केवळ २ षटकारांनी मागे आहे. त्याने आतापर्यंत २०२ सामन्यांत ९८ षटकार ठोकले आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत एकूण ३२ फलंदाजांनी षटकाराचे शतक ठोकले असून त्यामध्ये ७ भारतीयांचा समावेश आहे. यामध्ये धोनी (२१६), सचिन तेंडुलकर (१९२), सौरभ गांगुली (१९०), रोहित शर्मा (१६३), युवराज सिंग (१५५), विरेंद्र सेहवाग (१३५) आणि सुरेश रैना (१२०) यांचा समावेश आहे. (वृत्तसंस्था)उभय संघ यातून निवडणार :भारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, दिनेश कार्तिक, केदार जाधव, महेंद्रसिंह धोनी (यष्टिरक्षक), हार्दिक पंड्या, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि शार्दूल ठाकूर.दक्षिण आफ्रिका : फाफ डु प्लेसिस (कर्णधार), हाशिम अमला, क्विंटन डी कॉक, जेपी ड्यूमिनी, इमरान ताहिर, एडेन मार्कराम, डेव्हिड मिलर, मोर्ने मॉर्केल, ख्रिस मॉरिस, लुंगी एनगिडी, एंडिल फॅलुकवायो, कॅगिसो रबाडा, तबरेज शम्सी आणि खायालिला जोंडो.सामना : सायंकाळी ४.३० पासून (भारतीय वेळेनुसार)

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका २०१८क्रिकेट