Join us  

India Vs England, Latest News : मोहम्मद शमीने रचला इतिहास, ठरला पहिला भारतीय गोलंदाज

विश्वचषकात पाच बळी मिळवारा तो सहावा गोलंदाज ठरला. त्याने जो इतिहास रचला आहे, तो यापेक्षा वेगळा आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2019 7:45 PM

Open in App

बर्मिंगहम , आयसीसी वर्ल्ड कप 2019 : आतापर्यंत भारताच्या गोलंदाजांना जे जमले नव्हते ते भारताचा वेगवान गोलंदाज मोहमम्द शमीने यंदाच्या विश्वचषकात करून दाखवले आहे. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात तर शमीने पाच फलंदाजांना बाद करण्याचा पराक्रम केला. पण विश्वचषकात पाच बळी मिळवारा तो सहावा गोलंदाज ठरला. त्याने जो इतिहास रचला आहे, तो यापेक्षा वेगळा आहे.

या सामन्यात शमीने पाच बळी मिळवत शमीने इतिहास रचला आहे. विश्वचषकात एकाच डावात पाच बळी घेणारा शमी भारताचा सहावा गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी आशिष नेहरा, व्यंकटेश प्रसाद, युवराज सिंह, रॉबिन सिंह, कपिल देव यांनी विश्वचषकात पाच बळी मिळवले होते.

विश्वचषकातील सामन्यात पाच बळी मिळवणारा शमीला हा सहावा गोलंदाज ठरला असला तरी सलग तीन सामन्यांमध्ये चारपेक्षा जास्त बळी एकाही भारतीय गोलंदाजाला मिळवता आलेले नाही. त्यामुळे सलग तीन सामन्यांमध्ये चारपेक्षा जास्त बळी मिळवणारा शमी हा पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे. त्याचबरोबर क्रिकेट विश्वातही असा पराक्रम करणारा तो पहिला वेगवान गोलंदाज ठरला आहे. कारण यापूर्वी हा विक्रम पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीच्या नावावर होता. तायमुळे शमीने केलेला पराक्रम आतापर्यंत एका वेगवान गोलंदाजाला करता आलेला नाही.

इंग्लंडच्या फलंदाजांनी भारताच्या गोलंदाजीला चांगलंच झोडपलं. इंग्लंडचे सलामीवीर आणि बेन स्टोक्सच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर इंग्लंडने धावांचा डोंगर उभारला. हा धावांचा डोंगर भारतीय संघ जोरदार फटकेबाजी करून सर करणार का, याची उत्सुकता चाहत्यांना असेल. भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने यावेळी भेदक मारा केला, नाहीतर इंग्लंडचा संघ चारशे धावांच्या जवळपास जाऊ शकला असता. शमीने या सामन्यात पाच बळी मिळवत इंग्लंडच्या धावसंख्येवर दबाव आणण्याचे काम चोख बजावले. इंग्लंडच्या फलंदाजांनी फटकेबाजी करत भारतापुढे 338 धावांचे आव्हान ठवले.

इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रॉय आणि जॉनी बेअरस्टोव यांनी भारताच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेत दोघांनी अर्धशतके झळकावली. या दोघांनी 160 धावांची सलामी दिली. यानंतर रॉयने कुलदीप यादवच्या चेंडूवर मोठा फटका लगावला. हा चेंडू आता चौकार जाणार असे वाटत होते. पण मैदानात आलेल्या बाराव्या खेळाडूने (रवींद्र जडेजा) सूर लगावत झेल टिपला आणि भारताला पहिले यश मिळाले. 

रॉय बाद झाल्यावरही जॉनी दमदार फटकेबाजी करत होता. बेअरस्टोव हा भारतीय गोलंदाजीची पिसे काढत होता. जॉनीला बाद कसे करायचे, हा पेच कोहलीपुढे होते. त्यावेळी कोहलीने शमीला गोलंदाजीसाठी पाचारण केले. यावेळी शमीने कोहलीचा विश्वास सार्थ ठरवला. शमीने यावेळी फक्त जॉनीलाच बाद केले नाही तर इंग्लंडचा कर्णधार इऑन मॉर्गनलाही स्वस्तात तंबूत धाडले. जॉनीने यावेळी 10 चौकार आणि सहा षटकारांच्या जोरावर 111 धावांची खेळी साकारली.

जॉनी बाद झाल्यावर बेन स्टोक्सने इंग्लंडची धावगती वाढवण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याला जो रूट आणि जोस बटलर यांची साथ मिळाली. पण या दोघांनाही जास्त धावा करता आल्या नाहीत. स्टोक्सने 54 चेंडूंत सहा चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर 79 धावा केल्या.

टॅग्स :मोहम्मद शामीभारत विरुद्ध इंग्लंडवर्ल्ड कप 2019