Join us

India vs Australia, 3rd Test : अजिंक्य रहाणेची रणनिती यशस्वी ठरली, रवींद्र जडेजानं ऑसींना धक्के देत पहिले सत्र गाजवले

India vs Australia, 3rd Test, Day 2 : पहिल्या दिवशी पावसामुळे केवळ ५५ षटकांचा सामना झाला. पदार्पणवीर विल पुकोव्हस्की आणि मार्नस लाबुशेन यांनी वैयक्तिक अर्धशतक झळकावून संघाला २ बाद १६६ करून दिल्या.

By स्वदेश घाणेकर | Updated: January 8, 2021 07:22 IST

Open in App
ठळक मुद्देपहिल्या दिवशी रवींद्र जडेजानं टाकली फक्त तीनच षटकं, पण आज...मार्नस लाबुशेन शतकाच्या उंबरठ्यावरून माघारी परतलादुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रावर टीम इंडियाची पकड

India vs Australia, 3rd Test, Day 2 : सिडनी कसोटीचा पहिला दिवस पाऊस आणि ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी गाजवल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार अजिंक्य रहाणेच्या ( Ajinkya Rahane) निर्णयांवर बरीच चर्चा सुरू झाली. मेलबर्न कसोटीत योग्य डावपेच आखून ऑस्ट्रेलियाला शरणागती पत्करण्यास भाग पाडणारा अजिंक्य हरवला का, असा प्रश्न विचारला गेला. त्यात पहिल्या दिवशी रवींद्र जडेजा ( Ravindra Jadeja) याला तीनच षटकं दिल्यानं सर्वांनी आश्चर्य व्यक्त केलं. यावेळी अजिंक्यनं दुसऱ्या दिवसाची रणनिती ठरवली होती आणि त्याचा तो डाव पहिल्या सत्रात यशस्वी ठरला. जडेजानं त्याच्यावर सोपवलेली जबाबदारी सक्षमपणे पार पाडली आणि ऑसींना धक्के दिले.

पहिल्या दिवशी पावसामुळे केवळ ५५ षटकांचा सामना झाला. पदार्पणवीर विल पुकोव्हस्की आणि मार्नस लाबुशेन यांनी वैयक्तिक अर्धशतक झळकावून संघाला २ बाद १६६ करून दिल्या. पुकोव्हस्कीनं ११० चेंडूंत  ४ चौकारांच्या मदतीनं ६२ धावा केल्या. त्यानं लाबुशेनसह तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. लाबुशेन व स्टीव्ह स्मिथ ही जोडी चिकट निघाली. अश्विनच्या फिरकीचा चांगला अभ्यास करून ती मैदानावर उतरली होती. जडेजाचा कमीत कमी अभ्यास त्यांना करता यावा यासाठी अजिंक्यनं त्याला तीनच षटकं दिली.

दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रातही पावसाचा खेळ झाला. त्यानंतर लाबुशेन व स्मिथ या जोडीनंही शतकी भागीदारी केली. लाबुशेन शतकाच्या उंबरठ्यावर होता आणि अजिंक्यन जडेजाला पाचारण केलं. जडेजाच्या फिरकीवर लाबुशेन फसला आणि अजिंक्यनं स्लिपमध्ये शार्प कॅच टिपला. लाबुशेन १९६ चेंडूंत ११ चौकारांसह ९१ धावांवर माघारी परतला. स्मिथनं त्यानंतर अर्धशतक पूर्ण केले. पहिल्या दोन सामन्यांत सलामीला खेळणारा मॅथ्यू वेड पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. जडेजानं त्यालाही जाळ्यात अडकवलं आणि जसप्रीत बुमराह करवी झेलबाद करून माघारी पाठवलं. त्यानंतर बुमराहनं कॅमेरून ग्रीनला भोपळ्यावर बाद केले.

लंच ब्रेकपर्यंत ऑस्ट्रेलियानं ५ बाद २४९ धावा केल्या आहेत. भारतान पहिल्या सत्रात तीन विकेट्स ( रवींद्र जडेजानं टिपले दोन बळी) घेतल्या. आज जडेजाकडून अजिंक्यनं ९ षटकं टाकून घेतली.  

 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाअजिंक्य रहाणेरवींद्र जडेजा