Join us  

India vs Australia, 1st Test : ९.३९ ला जसप्रीत बुमराह आऊट झाला अन् १०.४९ला टीम इंडियाचा डाव आटोपला; पाहा भारताचे 'शेर' कसे झाले ढेर

India vs Australia, 1st Test: शरणागती कशी पत्करावी, तर टीम इंडियाच्या फलंदाजांसारखी... पहिल्या डावात ५३ धावांची आघाडी घेणारा भारतीय संघ दुसऱ्या डावात यजमान ऑस्ट्रेलियासमोर किमान आव्हानात्मक धावसंख्या उभी करेल असे वाटले होते.

By स्वदेश घाणेकर | Published: December 19, 2020 11:48 AM

Open in App

India vs Australia, 1st Test, 3rd Day : शरणागती कशी पत्करावी, तर टीम इंडियाच्या फलंदाजांसारखी... पहिल्या डावात ५३ धावांची आघाडी घेणारा भारतीय संघ दुसऱ्या डावात यजमान ऑस्ट्रेलियासमोर किमान आव्हानात्मक धावसंख्या उभी करेल असे वाटले होते. पण, जोश हेझलवूड व पॅट कमिन्स या जोडीनं जो दणका दिला, त्यातून टीम इंडियाला सावरताच आले नाही. टीम इंडिया पहिली कसोटी जिंकेल, असा दावा करणारे तोंडावर पडले. हेझलवूडनं ८ धावांत ५ विकेट्स घेतल्या. तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात ४२ धावा झाल्या, तर ८ फलंदाज माघारी परतले. भारताचा दुसरा डाव ३६ धावांवर गडगडला आणि ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी माफक ९० धावांचे लक्ष्य राहिले. मोहम्मद शमी रिटायर्ड हर्ट झाल्यानं भारताला ९ बाद ३६ धावांवर खेळ थांबवावा लागला. 

दुसऱ्या दिवसअखेर भारतानं दुसऱ्या डावात १ बाद ९ धावा करताना आघाडी ६२ धावांपर्यंत वाढवली. तिसऱ्या दिवशी बुमराह ( २) पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर माघारी परतला. पहिल्या डावात टीम इंडिला सावरणारा चेतेश्वर पुजारा भोपळाही फोडू शकला नाही. कमिन्सच्या इनस्वींग चेंडूंन त्याला बाद केले. पुढच्याच षटकात जोश हेझलवूडनं मयांक ( ९) आणि अजिंक्य रहाणे ( ०) यांना बाद करून टीम इंडियाची अवस्था ५ बाद १५ अशी दयनीय केली. कसोटी क्रिकेटमध्ये कमी धावांत पाच विकेट्स गमावण्याची ही दुसरी निचांक कामगिरी आहे. यापूर्वी १९५२मध्ये इंग्लंडविरुद्ध टीम इंडियाचे पाच फलंदाज ६ धावांवर माघारी परतले होते.  पॅट कमिन्सनं पुढच्या षटकात टीम इंडियाला मोठा धक्का दिला. विराट कोहली ४ धावांवर माघारी परतला. पदार्पणवीर कॅमेरून ग्रीननं अविश्वसनीय झेल घेताना विराटला चलते केले. टीम इंडियाची अवस्था ६ बाद १९ अशी झाली.

१९व्या षटकात जोश हेझलवूडनं पुन्हा सलग दोन चेंडूंत दोन धक्के दिले. वृद्धीमान सहा व आर अश्विन हे बाद झाल्यानंतर टीम इंडियाची हालत ८ बाद २६ अशी झाली. कसोटी क्रिकेटमध्ये प्रथमच भारताचे आघाडीचे ७ फलंदाज दुहेरी धावसंख्या करण्यात अपयशी ठरले. तसेच कसोटी क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच एखाद्या संघाच्या आघाडीच्या सहा फलंदाज दुहेरी धाव करण्यात अपयशी ठरले आहेत आणि हा लाजीरवाणा विक्रम टीम इंडियाच्या नावावर नोंदवला गेला आहे. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी ९० धावा कराव्या लागणार आहेत. 

पाहा व्हिडीओ...

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाविराट कोहलीपृथ्वी शॉजसप्रित बुमराहमयांक अग्रवालचेतेश्वर पुजाराअजिंक्य रहाणे