Join us  

India vs Australia, 1st Test : कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील लाजीरवाणा विक्रम टीम इंडियाच्या नावावर 

India vs Australia, 1st Test, 3rd Day : दुसऱ्या दिवसअखेर भारतानं दुसऱ्या डावात १ बाद ९ धावा करताना आघाडी ६२ धावांपर्यंत वाढवली. त्यात जसप्रीत बुमराहनं तिसऱ्या क्रमांकावर येताना भक्कम बचावात्मक खेळ केला. तिसऱ्या क्रमांकावर बढती मिळालेल्या जसप्रीत बुमराहचा अडथचा दूर केल्यानंतर पॅट कमिन्सनं चेतेश्वर पुजाराला शून्यावर बाद केले

By स्वदेश घाणेकर | Published: December 19, 2020 11:00 AM

Open in App

India vs Australia, 1st Test, 3rd Day : तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी वर्चस्व गाजवताना टीम इंडियाला एकामागून एक धक्के दिले. टीम इंडियाचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. पॅट कमिन्स आणि जोश हेझलवूड हे दोन गोलंदाजच टीम इंडियाला धक्के देण्यासाठी पुरेसे ठरले. चेतेश्वर पुजाराअजिंक्य रहाणे भोपळाही फोडू शकले नाही. जोश हेझलवूडनं ३ धावांत ५ विकेट्स घेतल्या. त्याच्या या भेदक माऱ्यामुळे टीम इंडियाच्या नावावर लाजीरवाणा विक्रम नोंदवला गेला. 

दुसऱ्या दिवसअखेर भारतानं दुसऱ्या डावात १ बाद ९ धावा करताना आघाडी ६२ धावांपर्यंत वाढवली. त्यात जसप्रीत बुमराहनं तिसऱ्या क्रमांकावर येताना भक्कम बचावात्मक खेळ केला. तिसऱ्या क्रमांकावर बढती मिळालेल्या जसप्रीत बुमराहचा अडथचा दूर केल्यानंतर पॅट कमिन्सनं चेतेश्वर पुजाराला शून्यावर बाद केले. त्यानंतर जोश हेझलवूडनं एकाच षटकात दोन धक्के देताना टीम इंडियाची अवस्था ५ बाद १५ अशी केली. १ बाद ९ धावांवरून तिसऱ्या दिवसाची सुरुवात करणाऱ्या भारतीय संघानं सहा धावांत चार विकेट्स गमावल्या.  

तिसऱ्या दिवशी बुमराह ( २) पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर माघारी परतला. पहिल्या डावात टीम इंडिला सावरणारा चेतेश्वर पुजारा भोपळाही फोडू शकला नाही. कमिन्सच्या इनस्वींग चेंडूंन त्याला बाद केले. पुढच्याच षटकात जोश हेझलवूडनं मयांक ( ९) आणि अजिंक्य रहाणे ( ०) यांना बाद करून टीम इंडियाची अवस्था ५ बाद १५ अशी दयनीय केली. कसोटी क्रिकेटमध्ये कमी धावांत पाच विकेट्स गमावण्याची ही दुसरी निचांक कामगिरी आहे. यापूर्वी १९५२मध्ये इंग्लंडविरुद्ध टीम इंडियाचे पाच फलंदाज ६ धावांवर माघारी परतले होते.  पॅट कमिन्सनं पुढच्या षटकात टीम इंडियाला मोठा धक्का दिला. विराट कोहली ४ धावांवर माघारी परतला. पदार्पणवीर कॅमेरून ग्रीननं अविश्वसनीय झेल घेताना विराटला चलते केले. टीम इंडियाची अवस्था ६ बाद १९ अशी झाली.

१९व्या षटकात जोश हेझलवूडनं पुन्हा सलग दोन चेंडूंत दोन धक्के दिले. वृद्धीमान सहा व आर अश्विन हे बाद झाल्यानंतर टीम इंडियाची हालत ८ बाद २६ अशी झाली. कसोटी क्रिकेटमध्ये प्रथमच भारताचे आघाडीचे ७ फलंदाज दुहेरी धावसंख्या करण्यात अपयशी ठरले. तसेच कसोटी क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच एखाद्या संघाच्या आघाडीच्या सहा फलंदाज दुहेरी धाव करण्यात अपयशी ठरले आहेत आणि हा लाजीरवाणा विक्रम टीम इंडियाच्या नावावर नोंदवला गेला आहे.  

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाविराट कोहलीमयांक अग्रवालपृथ्वी शॉचेतेश्वर पुजाराअजिंक्य रहाणेआर अश्विन