Join us  

IPL 2021साठी बीसीसीआयचा 'मेगा' प्लान; दोन नवीन संघ, परदेशी खेळाडूंच्या संख्येत वाढ?, पण फ्रँचायझींमध्ये मतभिन्नता

कोरोना व्हायरसच्या संकटात आयपीएल होणार की नाही याबाबत साशंकता होती, परंतु बीसीसीआयनं संयुक्त अरब अमिराती येथे लीग यशस्वीपणे आयोजित केली.

By स्वदेश घाणेकर | Published: November 13, 2020 4:26 PM

Open in App

Indian Premier League ( IPL 2020)च्या १३व्या पर्वाच्या यशानंतर BCCIनं पुढील वर्षी होणाऱ्या आयपीएलसाठी हालचाली सुरु केल्या आहेत. कोरोना व्हायरसच्या संकटात आयपीएल होणार की नाही याबाबत साशंकता होती, परंतु बीसीसीआयनं संयुक्त अरब अमिराती येथे लीग यशस्वीपणे आयोजित केली. मुंबई इंडियन्सनं ( Mumbai Indians) ऐतिहासिक जेतेपद पटकावताना प्रथमच अंतिम फेरीत प्रवेश करणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सवर ( Delhi Capitals) विजय मिळवला. या लीगमध्ये चेन्नई सुपर किंग्सला ( Chennai Super Kings) इतिहासात प्रथमच प्ले ऑफमध्ये स्थान पटकावता आले नाही. त्यामुळे २०२१च्या आयपीएलसाठी CSKला नव्यानं संघबांधणी करायची आहे. बीसीसीआयनंही मेगा ऑक्शनची तयारी केली आहे. पण, त्यावरून फ्रँचायझींमध्ये मतभिन्नता दिसत आहे.

पुढील वर्षी एप्रिल-मे या कालावधीत भारतातच आयपीएल खेळवण्याचा बीसीसीआयचा प्रयत्न आहे. पण, त्यात दोन संघांची भर पडण्याची शक्यता वर्तवरण्यात येत आहे. मागील वर्षीच अशी चर्चा रंगली होती. डिसेंबरच्या दुसऱ्या-तिसऱ्या आठवड्यात बीसीसीआय मेग प्लानबाबत घोषणा करण्याची शक्यता आहे. पण, २०२१साठी एकच नवीन संघ सहभागी होणार आहे, तर दुसरा संघ २०२२च्या आयपीएलमध्ये खेळेल. ''दिवाळीनंतर चित्र स्पष्ट होईल. त्यात दोन किंवा तीन फ्रँचायझी असतील यावर निर्णय घेतला जाईल. जर नवीन संघ सहभागी केले जाणार असतील तर मेगा ऑक्शन शिवाय पर्याय नाही,''असे बीसीसीआयच्या सूत्रांनी टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले.

फ्रँचायझींमध्ये मतभिन्नता...

मेगा ऑक्शन संदर्भात काही फ्रँचायझी नाखुश आहेत. बऱ्याच फ्रँचायझींनी त्यांची कोर टीम तयार केली आहे आणि त्या टीमलाच प्रोत्साहन देण्याचा त्यांचा मानस आहे. अशात लिलाव घेण्यात आल्यास त्यांना सर्वाधिक फटका बसू शकतो. पण, लिलाव झाल्यास काही संघांना नव्यानं संघबांधणी करणे शक्य होईल आणि त्यामुळे त्यांचा या लिलावाला पाठींबा आहे, असे सूत्रांनी सांगितले.  

मेगा ऑक्शन झाल्यास सर्वाधिक फायदा हा चेन्नई सुपर किंग्सला होईल. पुढील पर्वासाठी ते संपूर्ण संघ बदलण्याची शक्यता आहे. शेन वॉटसननं निवृत्ती घेतली आहे, तर इम्रान ताहीर, पीयूष चावला, हरभजन सिंग, मुरली विजय, केदार जाधव यांना संघ रिलीज करू शकतो. त्यामुळे त्यांना ऑक्शनची गरज आहे.  

अंतिम ११मध्ये आता ५ परदेशी खेळाडू?फ्रँचाझींना भारतीय खेळाडूंमध्ये स्पार्क सापडत नाही, त्यामुळे संघ संख्या वाढल्यास त्यांना क्वालिटी खेळाडू मिळवताना जड जाईल. त्यामुळे बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं अंतिम ११मधील परदेशी खेळाडूंची संख्या ५ करावी असा पर्याय सूचवला आहे.  

टॅग्स :आयपीएल लिलावबीसीसीआयआयपीएलIPL 2020