"शब्दच नाही, अस्वस्थ झालोय..." ; चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेवर विराट कोहली भावूक

बंगळुरूतील चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेवर आरसीबी खेळाडू विराट कोहलीने त्याच्या भावना व्यक्त केल्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 23:25 IST2025-06-04T23:15:00+5:302025-06-04T23:25:37+5:30

whatsapp join usJoin us
bangalore stampede: "At a loss for words. Absolutely gutted; Virat Kohli's reaction to the stampede incident | "शब्दच नाही, अस्वस्थ झालोय..." ; चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेवर विराट कोहली भावूक

"शब्दच नाही, अस्वस्थ झालोय..." ; चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेवर विराट कोहली भावूक

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

बंगळुरू - तब्बल १८ वर्षांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू टीमने आयपीएल विजेतेपदाचा खिताब पटकावला. RCB च्या या विजयामुळे कर्नाटकात मोठा जल्लोष करण्यात आला. मात्र या विजयी सोहळ्याला दु:खाची किनार लागली आहे. बंगळुरूत आज झालेल्या चेंगराचेंगरीत ११ चाहत्यांचा मृत्यू झाला आहे तर ३० हून अधिक जखमी झालेत. या दुर्घटनेवर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. 

बंगळुरूतील चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेवर आरसीबी खेळाडू विराट कोहलीने त्याच्या भावना व्यक्त केल्यात. त्यात शब्दच नाही, अस्वस्थ झाल्याचे त्याने म्हटलं आहे. या पोस्टसह विराटने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या फ्रेंचायसीकडून आलेले निवेदन शेअर केले आहे. या निवेदनात घडलेली घटना अतिशय दु:खद असून सर्व लोकांच्या सुरक्षेला आमचे प्राधान्य असल्याचे म्हटलं. या निवेदनात म्हटलंय की, बंगळुरूत आज टीमचे आगमन झाले तेव्हा मोठ्या संख्येने जनता तिथे आली. मात्र तेव्हा घडलेली दुर्घटना अत्यंत दु:खद आहे. मृत लोकांबद्दल आम्ही शोक व्यक्त करतो आणि पीडित कुटुंबांना आमच्या मनापासून संवेदना व्यक्त करतो असं त्यांनी सांगितले.


त्याशिवाय जेव्हा आम्हाला ही दुर्घटना कळली तेव्हा तातडीने आम्ही आमच्या कार्यक्रमात बदल केला. स्थानिक प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन केले असंही आरसीबी टीम प्रशासनाने स्पष्ट केले. चिन्नास्वामी मैदानाबाहेर मोठ्या संख्येने लोकांची गर्दी झाली. ही गर्दी नियंत्रणात आणण्यात पोलिसांना अपयश आले. त्यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत ११ लोकांचा मृत्यू झाला. ३३ लोकांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर सोशल मीडियात आयोजकांबद्दल नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

"३५ हजार क्षमता, ३ लाख लोक आले..."

दरम्यान, मी आणि माझे सरकार या घटनेचे राजकारण करत नाही. या प्रकाराबाबत १५ दिवसांत मॅजिस्ट्रेट चौकशी करण्यात येईल. इतक्या मोठ्या संख्येने चाहते स्टेडियमबाहेर जमले होते. विजयी सोहळ्यावेळी ही दुर्घटना घडली. सरकार या घटनेतील जखमींवर मोफत उपचार करेल. मृतांच्या वारसांना १० लाख रुपये दिले जातील. या दुर्घटनेमुळे विजयाचा आनंद हिरावून घेतला आहे. स्टेडियमची क्षमता ३५ हजार लोकांची होती परंतु या कार्यक्रमासाठी २-३ लाख लोक आले होते असं मुख्यमंत्री सिद्धराम्मैया यांनी म्हटलं. 

Web Title: bangalore stampede: "At a loss for words. Absolutely gutted; Virat Kohli's reaction to the stampede incident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.