अकरावीच्या विद्यार्थ्यांची अडचण वाढली; बायोमेट्रिक अनिवार्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 14:07 IST2025-05-30T14:06:14+5:302025-05-30T14:07:00+5:30
Chandrapur : अकरावी व बारावी कॅश क्रोर्सच्या नावाखाली सर्वत्र मोठमोठ्या इन्स्टिट्यूट निर्माण झाल्या आहेत.

Difficulty of 11th grade students increased; Biometrics mandatory
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : विद्यार्थ्यांची नियमित उपस्थिती वाढवणे, शिष्यवृत्ती, सवलतींसाठी पारदर्शकता आणणे, या उद्देशाने शिक्षण विभागाने राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी वर्गासाठी बायोमेट्रिक (आधार आधारित) हजेरी प्रणाली सक्तीची केली आहे. मात्र, बहुतांश विद्यार्थी मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये शिकवणी लावून एखाद्या छोट्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतात. अशा विद्यार्थ्यांना बायोमेट्रिक हजेरी चांगलीच अडचणीची जाणार आहे. यामुळे इन्स्टिट्यूट संचालक तसेच विद्यार्थ्यांची डोकेदुखी वाढली आहे.
अकरावी व बारावी क्रॅश क्रोर्सच्या नावाखाली सर्वत्र मोठमोठ्या इन्स्टिट्यूट निर्माण झाल्या आहेत. येथे प्रवेश घेतल्यानंतर ते छोट्या-मोठ्या कॉलेजमध्ये त्या विद्यार्थ्यांचा प्रवेश दाखतात. परंतु, आता बायोमेट्रिक हजेरीत हे शक्य नाही. त्यामुळे अडचण वाढणार आहे.
अकरावीची प्रवेश प्रक्रिया कशी राबवणार?
यंदाच्या शैक्षणिक सत्रात अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन सुरू झाली आहे. त्यासाठी पोर्टलवर विद्यार्थ्यांची नोंदणी सुरू झाली आहे. येथे ऑनलाइन कागदपत्रे अपलोड करावयाचे आहेत.
महाविद्यालयात नाही यंत्रणा
अनेक महाविद्यालयांमध्ये यंत्रणा अजूनही पूर्णपणे कार्यरत नाही. यासोबतच मशीन बंद असणे, अंगठा न ओळखला जाणे, कनेक्टिव्हिटी समस्या, सकाळी उशीर झाल्यास विद्यार्थ्यांची हजेरी लागत नाही आणि अनुपस्थिती नोंदवली जाते. अशाही अनेक अडचणी निर्माण होत असल्याची माहिती आहे. त्यामुळे शिक्षण संचालकांमध्येही अडचण निर्माण झाली आहे. तांत्रिक समस्यांही कायम आहे.
जिल्ह्यात अकरावीच्या २० हजार जागा
चंद्रपूर जिल्ह्यात अकरावी प्रवेशाच्या जवळपास २० हजार जागा आहेत. दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या २४ हजार २५ इतकी आहे. यातील काहीजण वेगवेगळ्या शाखा निवडतात.
थम्ब अटेन्डन्स नसल्यास मिळणार नाही योजनांचा लाभ
विद्यार्थ्यांची हजेरी वाढविण्याच्या अनुषंगाने तसेच पात्र विद्यार्थ्याला शैक्षणिक योजनेचा लाभ देण्याच्या अनुषंगाने थम्ब अटेन्डन्स बंधनकारक केले आहे.