पाऊस पडताना वीज उपकरणांपासून राहा सावधान ! अपघात टाळण्यासाठी महावितरणचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 16:34 IST2025-05-28T16:34:21+5:302025-05-28T16:34:57+5:30

Nagpur : सध्या पावसाचे दिवस असून धोका टाळण्यासाठी प्रत्येकांनी सुरक्षा बाळगणे आवश्यक आहे.

Be careful with electrical appliances when it rains! Mahavitaran appeals to prevent accidents | पाऊस पडताना वीज उपकरणांपासून राहा सावधान ! अपघात टाळण्यासाठी महावितरणचे आवाहन

Be careful with electrical appliances when it rains! Mahavitaran appeals to prevent accidents

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर :
मागील काही दिवसांपासून अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्यानंतर आता पावसाळ्याचे वेध लागले आहेत. या पार्श्वभूमीवर, संभाव्य धोके टाळण्यासाठी महावितरणने कंबर कसली आहे. मान्सूनपूर्व देखभाल आणि दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. नागरिकांनीही स्वतःच्या स्तरावर वीज उपकरणांची विशेष काळजी घेणे अत्यावश्यक आहे, असे आवाहन महावितरणने केले आहे. दरम्यान, वीज खांबाजवळ जाणे, स्पर्श करणे टाळले पाहिजे. विशेषतः ग्रामीण भागामध्ये वीज खांबाना बैल बांधले जाते, ते टाळले पाहिजे. 


अडचण आल्यास संपर्क साधा :
विजेसंबंधित कोणत्याही समस्यांसाठी किंवा आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी १८००२३३३४३५, १८००२१२३४३५ आणि १९१२ या टोल-फ्री क्रमांकावर २४ तास संपर्क साधता येईल. या क्रमांकांवर वीजपुरवठा खंडित झाल्याच्या तक्रारीसोबतच वीज अपघात आणि वीजबिलांसंबंधी तक्रारी देखील नोंदवण्याची सोय उपलब्ध आहे. 


घरात सुरक्षित राहा
ओल्या हातांनी विद्युत उपकरणांना स्पर्श करू नका. विद्युत उपकरणांचा पाण्याशी संपर्क येणार नाही, याची दक्षता घ्या. उपयोग नसताना विद्युत उपकरणांचे प्लग बोर्डातून काढून ठेवा. घरातील अर्थिगची नियमित तपासणी करा. ज्यांचे घर फयाचे आहे, त्यांनी पावसाळ्यापूर्वी घरातील वायरिंगची तपासणी करून घ्यावी, विजा कडकडत असताना टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन यांसारखी विद्युत उपकरणे वापरणे टाळा. प्लग काढून ठेवणे सुरक्षेसाठी योग्य आहे.


घराबाहेर अशी घ्या काळजी
पावसाळ्याच्या दिवसांत विजेच्या खांबापासून सुरक्षित अंतर ठेवा, वीज रोहित्र किंवा खांबाजवळ खड्डा असल्यास आणि त्यात पाणी साचले असल्यास त्यापासून दूर राहा. घराजवळ वीज तारा लोंबकळत असल्यास त्याची माहिती तत्काळ महावितरणच्या कर्मचाऱ्यांना द्या. घराशेजारी वीज तारा गेल्या असल्यास स्पर्श करू नका.

महावितरणची मान्सूनपूर्व कामे सुरू : नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

  • पावसाळ्यापूर्वी आपल्या परिसरातील वीज खांब, तारा, रोहित्र किंवा इतर कोणत्याही विद्युत उपकरणांत काही बिघाड आढळल्यास स्वतः दुरुस्ती करण्याचा प्रयत्न करू नये. त्याऐवजी त्वरित आपल्या भागातील महावितरणच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा.
  • वीज खांबांना स्पर्श करणे टाळा आणि पावसाळ्यापूर्वी घरातील वायरिंग व अर्थिग तपासून संभाव्य धोका टाळा. अनेकदा पावसाळ्यात वीजपुरवठा खंडित झाल्यास काही नागरिक त्वरित वीज सुरू करण्याच्या प्रयत्नात अकुशल वायरमनची मदत घेतात. मात्र, असे करणे धोकादायक ठरू शकते आणि त्यामुळे गंभीर अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे, अधिकृत तंत्रज्ञांचीच मदत घ्यावी, पावसाच्या दिवसामध्ये वीज खांबापासून दूर राहण्याचे तसेच घरातील अर्थिग तपासण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

Web Title: Be careful with electrical appliances when it rains! Mahavitaran appeals to prevent accidents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.