Lokmat Money > बिझनेस न्यूज > एवढे कोणीच करत नाही, पण ग्रुपने रतन टाटांचा वारसा जपला; मृतांच्या कुटुंबीयांसाठी ट्रस्ट स्थापणार

एवढे कोणीच करत नाही, पण ग्रुपने रतन टाटांचा वारसा जपला; मृतांच्या कुटुंबीयांसाठी ट्रस्ट स्थापणार

Tata Group : एअर इंडिया विमान अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना आधार देण्यासाठी टाटा ग्रुपने विशेष ट्रस्ट स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 13:35 IST2025-06-27T13:31:01+5:302025-06-27T13:35:23+5:30

Tata Group : एअर इंडिया विमान अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना आधार देण्यासाठी टाटा ग्रुपने विशेष ट्रस्ट स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

Tata Group Sets Up ₹500 Crore Trust for Air India Crash Victims' Families | एवढे कोणीच करत नाही, पण ग्रुपने रतन टाटांचा वारसा जपला; मृतांच्या कुटुंबीयांसाठी ट्रस्ट स्थापणार

एवढे कोणीच करत नाही, पण ग्रुपने रतन टाटांचा वारसा जपला; मृतांच्या कुटुंबीयांसाठी ट्रस्ट स्थापणार

Tata Group : १२ जून रोजी अहमदाबादमध्ये झालेल्या भीषण एअर इंडिया विमान अपघाताने संपूर्ण देशाला हादरवून सोडले होते. या दुर्घटनेत २७१ निष्पाप लोकांचा मृत्यू झाला. आता, या दु:खद घटनेमुळे प्रभावित झालेल्या कुटुंबांना मदतीचा हात देण्यासाठी टाटा समूह पुढे सरसावला आहे. टाटा ग्रुपची होल्डिंग कंपनी टाटा सन्सने बाधित कुटुंबांसाठी एक विशेष ट्रस्ट स्थापन करण्याची तयारी सुरू केली आहे.

ट्रस्टसाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी झालेल्या एका महत्त्वाच्या बोर्ड बैठकीत टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी या प्रस्तावित ट्रस्टची योजना मांडली. या ट्रस्टसाठी ५०० कोटी रुपयांपर्यंत निधीची तरतूद करण्याची मंजुरी मागण्यात आली आहे. या निधीचा वापर अपघातात मृत्यू झालेल्या २७१ लोकांच्या कुटुंबियांना भरपाई देण्यासाठी, जखमींवर उपचार करण्यासाठी आणि अपघातामुळे नुकसान झालेल्या वैद्यकीय महाविद्यालयाची दुरुस्ती करण्यासाठी केला जाईल.

केवळ भरपाई नाही, तर दीर्घकाळ मदत
या ट्रस्टचा उद्देश केवळ तात्काळ आर्थिक मदत देणे नाही, तर कुटुंबांना दीर्घकाळ आधार देणे आहे. या ट्रस्टद्वारे मृतांच्या मुलांचे शिक्षण, त्यांच्या दैनंदिन खर्चाची आणि भविष्यातील गरजांची पूर्तता केली जाईल, जेणेकरून त्यांना या दुःखातून बाहेर पडायला मदत होईल. सुरुवातीला टाटा सन्स दोन वेगळे ट्रस्ट स्थापन करण्याचा विचार करत होते – एक भारतीय आणि दुसरा परदेशी नागरिकांच्या कुटुंबियांसाठी, पण आता एकाच ट्रस्टद्वारे सर्वांना मदत दिली जाईल.

जबाबदारी अनुभवी हातांमध्ये
या महत्त्वाच्या कामाची जबाबदारी टाटा मोटर्सचे वित्त प्रमुख (CFO)*पी.बी. बालाजी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. त्यांचा पैशाचे नियोजन आणि कंपन्यांचे कामकाज योग्य दिशेने चालवण्याचा अनुभव या ट्रस्टसाठी खूप महत्त्वाचा ठरेल. ट्रस्टच्या कामात पूर्ण पारदर्शकता ठेवण्यासाठी टाटा समूहाबाहेरील लोकांनाही यामध्ये सामील केले जाईल.

वाचा - नोएल टाटांनी करुन दाखवलं! अशी कामगिरी करणारा टाटा ग्रुप पहिलाच भारतीय ब्रँड; दुसरा-तिसरा कोण?

टाटा ट्रस्टशी संबंधित नोएल टाटा, वेणू श्रीनिवासन आणि विजय सिंग यांसारखे अनुभवी सदस्यही या बैठकीला उपस्थित होते. टाटा ग्रुपच्या या निर्णयामुळे पुन्हा एकदा त्यांची सामाजिक बांधिलकी दिसून आली आहे.
 

Web Title: Tata Group Sets Up ₹500 Crore Trust for Air India Crash Victims' Families

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.