Maharashtra Weather Update : राज्यभरात मान्सूनचा (Monsoon) जोर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र ते घाटमाथ्यांपर्यंत पावसाने झोडपलं असून काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. (Maharashtra Weather Update)
मुंबई, ठाणे, रायगड, पुणे, सातारा व नाशिकच्या घाटमाथ्यावर पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. यामुळे शेतीच्या कामांवर परिणाम होण्याची शक्यता असून शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याची गरज आहे. पुढील २४ ते ४८ तास राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.(Maharashtra Weather Update)
राज्यात मान्सूनने (Monsoon) जोरदार हजेरी लावली आहे. मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून, ठाणे, कल्याण-डोंबिवली, बदलापूर, वसई-विरारसह संपूर्ण कोकणात दमदार सरी कोसळत आहेत.(Maharashtra Weather Update)
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रावर दाट ढगांचा समूह निर्माण झाला असून, कोकण आणि घाटमाथ्यांवर मुसळधार पावसाचा जोर दिसून येत आहे.
कोणत्या भागात अधिक पावसाचा इशारा?
रायगड, पुणे (घाट भाग), सातारा (घाट भाग) : या ठिकाणी पुढील २४ तासांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
नाशिक, पालघर : घाट भागात पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
कोकण-गोवा पट्टा : संपूर्ण भागात पावसाची स्थिती कायम आहे.
उत्तर महाराष्ट्र (जळगाव, धुळे, नंदुरबार) : अंशतः ढगाळ वातावरण राहिल.
नागरिकांना महत्त्वाची सूचना
मुंबई व उपनगरांमध्ये सततच्या पावसामुळे काही ठिकाणी पाणी साचण्याची शक्यता आहे. नागरिकांनी गरजेशिवाय बाहेर पडण्याचे टाळावे आणि सुरक्षित स्थळी थांबावे.
पुढचे दोन दिवस हवामान कसे राहणार?
येत्या २४ ते ४८ तासांत कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता कायम आहे.
४८ तासांनंतर पावसाचा जोर हळूहळू कमी होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
शेतकऱ्यांना सल्ला
* पावसाचा जोर वाढल्यामुळे उभ्या पिकांमध्ये पाणी साचू नये, याची काळजी घ्या.
* शक्य असल्यास खालच्या भागातील शेतात निचरा व्यवस्था करा.