Maharashtra Rain Alert : राज्यातील काही भागात मान्सूनचा कहर (Heavy Rain) सुरूच आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील चार दिवस अतिवृष्टीचा धोका निर्माण झाला आहे. हवामान विभागाने कोकण, घाटमाथा आणि काही शहरी भागांसाठी ऑरेंज व यलो अलर्ट जारी केला आहे. (Maharashtra Weather Update)
पावसाच्या या तडाख्याने जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता असून, प्रशासन सज्ज झाले आहे. महाराष्ट्रात पावसाचा जोर (Heavy Rain) वाढण्याची शक्यता असल्याने हवामान विभागाने राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. (Maharashtra Weather Update)
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, कोकण, गोवा तसेच मध्य महाराष्ट्रातील घाट भागांत २२ ते २५ जून दरम्यान मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
ऑरेंज अलर्ट
सिंधुदुर्ग जिल्ह्यात २३ जून रोजी, तर सातारा जिल्ह्यातील घाट परिसरात २३ ते २५ जून दरम्यान ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
याशिवाय रायगड, रत्नागिरी आणि पुणे जिल्ह्यांतील घाट परिसरातही पावसाचा जोर अधिक असल्याने २२ ते २५ जून दरम्यान ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
यलो अलर्ट
पालघर, ठाणे, कोल्हापूर (घाट क्षेत्र), नाशिक आणि मुंबईसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. याठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.
कधी कोणता अलर्ट
मुंबई : यलो अलर्ट (२२ ते २४ जून)
पालघर, ठाणे, कोल्हापूर (घाट क्षेत्र) : यलो अलर्ट (२२ ते २५ जून)
नाशिक (घाट क्षेत्र) : यलो अलर्ट (२३ ते २५ जून)
सातारा (घाट क्षेत्र) : यलो अलर्ट (२२ जून), ऑरेंज अलर्ट (२३ ते २५ जून)
सिंधुदुर्ग : यलो अलर्ट (२२, २४, २५ जून)
मान्सूनची सद्या स्थिती काय?
मान्सून सध्या जयपूर, आग्रा, रामपूर, डेहराडून, शिमला आणि मनाली या भागांपर्यंत पोहोचला आहे. पुढील दोन दिवसांत राजस्थान, उत्तर प्रदेशचा उर्वरित भाग आणि लडाखच्या काही भागांमध्ये मान्सून पोहोचण्यास हवामान पोषक असल्याचे भारतीय हवामान विभागाने सांगितले आहे.
शेतकऱ्यांना सल्ला
* पेरणीची घाई करू नका
* ज्या भागात अतिवृष्टीचा अंदाज आहे, त्या ठिकाणी पेरणी काही दिवसांकरिता थांबवावी. जास्त पावसामुळे बियाणे वाहून जाऊ शकते.
* समुद्रात मासेमारीसाठी न जाण्याचा सल्ला
* या चार दिवसांत समुद्र खवळलेला राहणार असल्याने मच्छीमार बांधवांनी मासेमारीसाठी समुद्रात जाणे टाळावे, असा सल्ला देण्यात आला आहे.