'त्या ' मालिकेत सहभागी होणाऱ्या भारतीय खेळाडूंवर आयसीसी करणार कारवाई

एप्रिल आणि मे महिन्यामध्ये भारतीय पुरुष आणि महिला संघांबरोबर ट्वेन्टी-20 मालिका खेळवण्याचे जाहीर केले होते. या मालिकेची घोषणा करण्यापूर्वी अमेरिकेच्या क्रिकेट मंडळाने आयसीसीची परवानगी घेतली नव्हती.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2018 08:44 PM2018-03-12T20:44:05+5:302018-03-12T20:44:05+5:30

whatsapp join usJoin us
ICC's action against Indian players participating in that series | 'त्या ' मालिकेत सहभागी होणाऱ्या भारतीय खेळाडूंवर आयसीसी करणार कारवाई

'त्या ' मालिकेत सहभागी होणाऱ्या भारतीय खेळाडूंवर आयसीसी करणार कारवाई

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देभारत आणि अमेरिका या दोन देशांमधील क्रिकेट मालिकेला आयसीसीने सोमवारी परवानगी नाकारली आहे.

दुबई : भारत आणि अमेरिका या दोन देशांमधील क्रिकेट मालिकेला आयसीसीने सोमवारी परवानगी नाकारली आहे. त्यामुळे या मालिकेत जे भारतीय खेळाडू सहभागी होतील त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा आयसीसीने दिला आहे.

गेल्या वर्षी जून महिन्यामध्ये आयसीसीने अमेरिकेच्या क्रिकेट मंडळावर कारवाई केली होती. कारण त्यांनी आगामी एप्रिल आणि मे महिन्यामध्ये भारतीय पुरुष आणि महिला संघांबरोबर ट्वेन्टी-20 मालिका खेळवण्याचे जाहीर केले होते. या मालिकेची घोषणा करण्यापूर्वी अमेरिकेच्या क्रिकेट मंडळाने आयसीसीची परवानगी घेतली नव्हती. त्यामुळेच आयसीसीने अमेरिकेच्या क्रिकेट मंडळाला बडतर्फ केले होते.

याबाबत आयसीसीने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आयसीसीने आपल्या पत्रकात म्हटले आहे की, " या दोन्ही मालिका अधिकृत नाहीत. कारण आयसीसी आणि बीसीसीआय या दोन्ही संघटनांनी या मालिकांना परवानगी दिलेली नाही. त्यामुळे या मालिकेत जे खेळाडू, प्रशिक्षक, सामनाधिकारी सहभागी होतील त्यांच्यावर गंभीर कारवाई करण्यात येईल. "

क्रिकेट विश्वामध्ये जर कोणतीही मालिका खेळवायची असेल तर त्यासाठी दोन्ही देशांच्या क्रिकेट मंडळांची परवानगी असणे बंधनकारक असते. त्यानंतर आयसीसीची परवानगी मिळाली तरच या दोन देशांतील मालिका अधिकृतपणे खेळवल्या जाऊ शकतात.

Web Title: ICC's action against Indian players participating in that series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.