निकचा तर बहाणा होता; प्रियांका चोप्राला होती ‘ही’ भीती, म्हणून सोडला ‘भारत’??

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2018 07:50 PM2018-07-27T19:50:12+5:302018-07-27T19:52:46+5:30

ऐनवेळी सलमान खानच्या ‘भारत’मधून अंग काढून घेत, प्रियांका चोप्राने सगळ्यांनाच धक्का दिला. खरे तर भाईजानशी पंगा घेण्याची हिंमत कुणीच सहसा करत नाही, मग प्रियांकाने हे पाऊल का उचलावे?

this is the real reason of priyanka chopra quit salman khan film bharat | निकचा तर बहाणा होता; प्रियांका चोप्राला होती ‘ही’ भीती, म्हणून सोडला ‘भारत’??

निकचा तर बहाणा होता; प्रियांका चोप्राला होती ‘ही’ भीती, म्हणून सोडला ‘भारत’??

googlenewsNext

ऐनवेळी सलमान खानच्या ‘भारत’मधून अंग काढून घेत, प्रियांका चोप्राने सगळ्यांनाच धक्का दिला. खरे तर भाईजानशी पंगा घेण्याची हिंमत कुणीच सहसा करत नाही, मग प्रियांकाने हे पाऊल का उचलावे? बॉयफ्रेन्ड निक जोनासला वेळ द्यायचा असल्याने प्रियांकाने ‘भारत’सोडल्याचे दिग्दर्शक अली अब्बास जफरने सांगितले. (प्रियांकाने ‘भारत’ सोडला आणि नेमक्या याचक्षणाला निकच्या व तिच्या साखरपुड्याची बातमी व्हायरल झाली. पण ‘भारत’ सोडणे आणि प्रियांकाने साखरपुडा करणे, हा योगायोग कसा असू शकतो?) पण खरे सांगायचे तर हे कारण फारसे पटणारे नाही. कारण प्रियांका किती प्रोफेशनल आहे, हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. मग असे असताना प्रियांकाने ‘भारत’ का सोडावा? तर आता यामागचे अन्य एक कारणही समोर आले आहे.

 पिंकविलाने दिलेल्या बातमीनुसार, प्रियांका काही दिवसांपूर्वी दोन दिवसांसाठी भारतात आली होती. या दोन दिवसांत तिने ‘भारत’चे शूटींग केले होते. अर्थात या शूटबद्दल केवळ युनिटच्या लोकांनाच माहिती होते. प्रियांका ‘भारत’मधील आपल्या भूमिकेवर खुश होती. दोन दिवस शूटींग करून प्रियांका अमेरिकेला परतली. पण इथे गेल्यावर प्रियांकाच्या कानावर वेगळ्याच बातम्या येऊ लागल्यात. चित्रपटात आणखी काही अभिनेत्रींना कास्ट करण्यात आल्याचे तिला कळले. आधी दिशा पाटनीचे नाव समोर आले. मग तब्बू या चित्रपटाशी जुळल्याचे तिला कळले आणि पाठोपाठ नोरा फतेही हिलाही कास्ट करण्यात आल्याचे कळले. या तिघींसाठी खास भूमिका तयार करण्यात आल्याचेही प्रियांकाच्या कानावर गेल़े. सलमानच्या म्हणण्यावरून हे सगळे झाल्याचेही प्रियांकाला कळले. आता इतक्या साऱ्या अभिनेत्रींमध्ये आपली स्थिती काय होईल, हे न कळण्याइतपत प्रियांका दुधखुळी नक्कीच नाही. आपली स्थितीही ‘रेस3’च्या जॅकलिन फर्नांडिससारखी किंवा डेजी शाहसारखी झाल्याशिवाय राहणार नाही, हे प्रियांकाने हेरले. मग काय कुणाचीही तमा न बाळगता या चित्रपटाला नकार देणेचं तिने योग्य समजले. प्रियांकाला कुणालाही दुखवायचे नव्हते, त्यामुळे निकचा बहाणा करून तिने यातून सुटायचा प्रयत्न केला. 
यासगळ्या घडामोडीत प्रियांकाने आपल्या चाहत्यांना आणि ‘भारत’च्या मेकर्सला दिलासा देण्यासाठी स्वत:च्या साखरपुड्याची बातमी चालवली. पण प्रियांकाने कितीही हुशारीने प्लान खेळला तरी सलमान फसणारा नाहीच. यापुढे कधीच प्रियांकासोबत काम करणार नसल्याची शपथ त्याने म्हणे घेतलीय.

 

 

Web Title: this is the real reason of priyanka chopra quit salman khan film bharat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.