Join us
Daily Top 2 Weekly Top 5

महाशिवरात्र विशेष: बेल पान खाल्ल्यानं काय होतं? ५ कारणं, बेलाचं पान खाणंही तब्येतीसाठी फायद्याचं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 11:29 IST

1 / 9
महाशिवरात्रीच्या (Mahashivratri Special) दिवशी भगवान शंकराला अत्यंत प्रिय असलले बेल पत्र अर्पण करण्याला विशेष महत्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार बेलाची तीन पानं त्रिगुणांचे प्रतिक मानली जातात. ज्याच्या अर्पणाचे शिव प्रसन्न होतात. अध्यात्मिक फायद्यांसोबतच रिकाम्या पोटी बेलाची पानं खाणं तब्येतीसाठी वरदान ठरते. (Bael Leaf Eating Benefits)
2 / 9
बेल पत्रातील गुणधर्मांमुळे गॅस, अपचन आणि बद्धकोष्टतेचा त्रास कमी होतो. बेल पानं थंड प्रवृत्तीचे असते. उन्हाळ्यात याचे सेवन केल्यानं शरीरातील उष्णता कमी होते.
3 / 9
रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी बेलाची पानं प्रभावी ठरतात. यात एंटी बॅक्टेरिअल गुणधर्म असतात. बेलाची पानं लावल्यानं खाज, पुरळ एक्जिमा यांसारख्या समस्या कमी होण्यास मदत होते.
4 / 9
रक्तातील खराब कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी आणि रक्तदाब संतुलित ठेवल्यास यात असलेले एंटी ऑक्सिडंट्स शरीराची संसर्गाशी लढण्याची क्षमता वाढवतात.
5 / 9
बेलाचा रस किंवा पानं हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी, तसंच हृदयाचे आरोग्य जपण्यात मदत करतात.
6 / 9
सर्दी, खोकला किंवा दम्याचा त्रास असलेल्या लोकांसाठी बेलाच्या पानांचा रस मधासोबत घेणं फायदेशीर ठरतं. यामुळे कफ बाहेर पडण्यास मदत होते.
7 / 9
जर तोंडात वारंवार फोड येत असतील तर बेलाची पानं चावून खाल्ल्यानं जखमा लवकर भरून निघतात.
8 / 9
शरीरातील विषारी द्रव्य बाहेर काढण्यासाठी हे एक उत्तम डिटॉक्स एजंट आहे. जे रक्तातील अशुद्धी दूर करून यकृत कार्यक्षम ठेवतात.
9 / 9
बेल पान खाताना ते स्वच्छ धुवून घ्या आणि एकावेळी २ ते ३ पानांपेक्षा जास्त सेवन करू नका.
टॅग्स : महाशिवरात्रीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सहेल्थ टिप्सआरोग्य