जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि ICMR च्या आकडेवारीनुसार, गेल्या काही दशकांमध्ये भारतात लठ्ठपणाचं प्रमाण जवळजवळ दुप्पट झालं आहे. शहरी भागात अंदाजे २०-३० टक्के प्रौढ आणि १०-१५ टक्के लहान मुलांचं वजन जास्त आहे. बदलती जीवनशैली, शारीरिक हालचालींचा अभाव, ताणतणाव, झोपेची कमतरता आणि जंक फूड आणि पॅकेज्ड पदार्थांचे जास्त सेवन हे लठ्ठपणासाठी जबाबदार मानलं जातं. काही दिवसांपूर्वी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने वजन कमी करण्यासाठी सोपी पद्धत सांगितली आहे.
आरोग्य मंत्रालयाने एका ट्विटमध्ये लिहिलं आहे की, "वजन कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी योग्य हायड्रेशन महत्त्वाची भूमिका बजावतं. तुम्ही दररोज नेमकं किती पाणी पिता याकडे लक्ष द्या. निरोगी शरीर आणि चांगली जीवनशैलीकडे हे तुमचं पहिलं पाऊल असू शकतं." यासोबतच ग्राफिक्स शेअर करण्यात आलं आहे. वजन घटवण्यासाठी पुरेसे पाणी प्या. डिहायड्रेशनमुळे थकवा आणि अशक्तपणा येऊ शकतो. मानवी शरीर ५५-६०% पाण्याने बनलेले आहे.
पाणी कसं प्यावं ?
रिव्ह्यूमध्ये असं आढळून आलं की, जे लोक साधं पाणी जास्त पितात त्यांचं वजन कमी होण्याची शक्यता जास्त असते. खरं तर जेवणापूर्वी ५०० मिली पाणी प्यायल्याने मध्यमवयीन आणि वृद्ध लोकांमध्ये भूक आणि ऊर्जा कमी खर्च होते. असंही आढळून आलं की, कोल्ड ड्रिंक ऐवजी पाणी प्यायल्याने शरीराचं वजन सरासरी ०.३३ किलोने कमी होतं. हायपोहायड्रेशनमुळे लठ्ठपणा आणि मधुमेहासह शरीरावर नकारात्मक परिणाम होऊ शकतात.
जेवणाआधी पाणी प्यायल्याने काय होतं?
हार्वर्ड हेल्थ पब्लिशिंगचे सिनियर फॅकल्टी एडिटर डॉ. रॉबर्ट एच. श्मर्लिंग यांच्या मते, जेवणाआधी पाणी पिण्याचे काही फायदे असू शकतात. जर तुम्ही जेवणाआधी तुमचं पोट पाण्याने भरलं तर तुम्हाला पोट भरल्यासारखं वाटेल आणि तुम्ही कमी खाल.
अनेक रिसर्चमधून असं दिसून आलं आहे की, जेवणाआधी पाणी पिणारे लोक कमी जेवले. त्यामुळे पाणी न पिणाऱ्यांच्या तुलनेत या लोकांनी १२ आठवड्यांत वजन कमी केलं. जेवणाआधी पाणी पिणं हे स्वाभाविकपणे चांगलं आहे. असं केल्याने तुमच्या पोटातील नसा मेंदूला खाणं थांबवण्याची वेळ आली असल्याचे संकेत देतात. जर तुम्ही सामान्यतः हायकॅलरी ड्रिंक पित असाल, तर त्याऐवजी पाणी प्या. यामुळे कालांतराने वजन कमी होण्यास मदत होऊ शकते. ICMR आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशनच्या मते, शरीराचं वजन आणि एक्टिव्हिटीवर आधारीत पाण्याचं प्रमाण ठरवलं जातं.
Web Summary : Obesity is rising in India. The Health Ministry suggests adequate hydration for weight control. Drinking water before meals can reduce calorie intake and aid weight loss. Staying hydrated prevents fatigue. Individual water needs vary based on activity level.
Web Summary : भारत में मोटापा बढ़ रहा है। स्वास्थ्य मंत्रालय वजन नियंत्रण के लिए पर्याप्त हाइड्रेशन का सुझाव देता है। भोजन से पहले पानी पीने से कैलोरी की मात्रा कम हो सकती है और वजन घटाने में मदद मिल सकती है। हाइड्रेटेड रहने से थकान दूर रहती है। पानी की व्यक्तिगत आवश्यकता गतिविधि स्तर पर निर्भर करती है।