Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > पाणी स्वच्छ ठेवण्यासाठी करा ३ पारंपरिक उपाय, पाण्यातील पोषण वाढेल आणि पाणी राहील सुगंधी

पाणी स्वच्छ ठेवण्यासाठी करा ३ पारंपरिक उपाय, पाण्यातील पोषण वाढेल आणि पाणी राहील सुगंधी

Follow these 3 traditional remedies to keep water clean, the nutrients in the water will increase and the water will remain fragrant : पाण्यात घाला हे तीन पदार्थ. पाणी राहते स्वच्छ.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2025 14:38 IST2025-12-15T14:35:28+5:302025-12-15T14:38:53+5:30

Follow these 3 traditional remedies to keep water clean, the nutrients in the water will increase and the water will remain fragrant : पाण्यात घाला हे तीन पदार्थ. पाणी राहते स्वच्छ.

Follow these 3 traditional remedies to keep water clean, the nutrients in the water will increase and the water will remain fragrant. | पाणी स्वच्छ ठेवण्यासाठी करा ३ पारंपरिक उपाय, पाण्यातील पोषण वाढेल आणि पाणी राहील सुगंधी

पाणी स्वच्छ ठेवण्यासाठी करा ३ पारंपरिक उपाय, पाण्यातील पोषण वाढेल आणि पाणी राहील सुगंधी

स्वच्छ आणि शुद्ध पाणी हे उत्तम आरोग्याचे मूळ आहे. मात्र आजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येक वेळी उकळलेले किंवा फिल्टरचे पाणी उपलब्ध असेलच असे नाही. अशा वेळी आपल्या पारंपरिक ज्ञानात सांगितलेले काही सोपे, नैसर्गिक आणि प्रभावी उपाय पाणी शुद्ध करण्यासाठी उपयोगी ठरतात. पाण्यात तुलसी ड्रॉप्स घालणे, वाळा घालणे किंवा तुरटी फिरवणे हे असेच घरगुती उपाय आहेत, जे पाणी शुद्ध करण्यासोबतच आरोग्यालाही फायदेशीर ठरतात.

पाण्यात तुलसी ड्रॉप्स घालण्याची सवय अनेक घरांमध्ये आहे. पाने खराब होतात मात्र अर्क पाण्यात विरघळून त्याचे पोषण वाढवते. तुलसीमध्ये नैसर्गिक अँटीबॅक्टेरियल आणि अँटीव्हायरल गुणधर्म असतात. पाण्यात काही थेंब तुलसी ड्रॉप्स घातल्याने पाण्यातील हानिकारक जंतूंची वाढ कमी होण्यास मदत होते. हे पाणी प्यायल्यास सर्दी, खोकला, घसा दुखणे यांसारख्या तक्रारी कमी होऊ शकतात. तसेच तुळस पचनक्रिया सुधारते, शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. त्यामुळे तुलसी ड्रॉप्स घातलेले पाणी हे शुद्ध आणि आरोग्यदायी ठरते.

वाळा किंवा खस हा केवळ सुगंधासाठीच नाही तर पाणी शुद्ध करण्यासाठीही फार उपयुक्त आहे. उन्हाळ्यात माठात वाळा घालण्याची पद्धत पूर्वीपासून चालत आली आहे. वाळा पाण्यात टाकल्याने पाण्याला नैसर्गिक, सौम्य सुगंध येतो आणि पाणी थंड राहते. वाळ्यामध्ये पाणी स्वच्छ ठेवण्याचे गुणधर्म असतात. हे पाणी प्यायल्याने शरीरातील उष्णता कमी होते, लघवीचा त्रास कमी होतो आणि पचनावरही सकारात्मक परिणाम होतो. रासायनिक फ्लेवर न वापरता पाणी शुद्ध आणि चविष्ट करण्याचा हा एक अतिशय सोपा उपाय आहे.

तुरटी फिरवणे हा पाणी शुद्ध करण्याचा एक जुना आणि प्रभावी घरगुती उपाय आहे. पाण्यात तुरटीचा छोटासा तुकडा फिरवून नंतर काढून टाकला जातो. यामुळे पाण्यातील घाण आणि सूक्ष्म कण खाली बसण्यास मदत होते. विशेषतः विहीर, टाकी किंवा साठवलेल्या पाण्यासाठी हा उपाय उपयोगी ठरतो. तुरटीमध्ये जंतुनाशक गुणधर्म असल्यामुळे पाणी अधिक स्वच्छ आणि सुरक्षित होते. ग्रामीण भागात आजही हा उपाय मोठ्या प्रमाणावर वापरला जातो.

हे तिन्ही उपाय पाहिले तर लक्षात येते की पाणी शुद्ध करण्यासाठी नेहमी महागडी साधने किंवा रसायनेच लागतात असे नाही. तुलसी ड्रॉप्स, वाळा आणि तुरटी हे सहज उपलब्ध होणारे स्वस्त आणि नैसर्गिक उपाय आहेत. योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने वापर केल्यास हे उपाय पाण्याची गुणवत्ता सुधारतात आणि आरोग्यासाठीही उपयुक्त ठरतात.

Web Title : पानी शुद्ध करने के 3 पारंपरिक तरीके: स्वास्थ्य और सुगंध में वृद्धि

Web Summary : तुलसी, खस या फिटकरी जैसे पारंपरिक तरीके पानी को स्वाभाविक रूप से शुद्ध करते हैं। तुलसी में जीवाणुरोधी गुण होते हैं। खस ठंडक पहुंचाता है और पाचन में मदद करता है। फिटकरी अशुद्धियों को दूर करता है, सुरक्षित और सुलभ शोधन प्रदान करता है।

Web Title : 3 Traditional Ways to Purify Water: Health & Fragrance Boost

Web Summary : Traditional methods like adding tulsi, vetiver, or alum purify water naturally. Tulsi has antibacterial properties. Vetiver cools and aids digestion. Alum settles impurities, offering safe, accessible purification.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.