विराट... विराट... वेस्ट इंडिजला पहिल्याच सामन्यात कोहलीने पाजले पाणी

वेस्ट इंडिजने भारतापुढे २०८ धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान पार करण्यात विराटचा सिंहाचा वाटा आहे.

विराटने या सामन्यात नाबाद ९४ धावांची खेळी साकारत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

कोहलीने या धमाकेदार खेळीसह विश्वविक्रमालाही गवसणी घातली आहे.

हा विश्वविक्रम रचताना कोहलीने रोहित शर्माला पिछाडीवर सोडले आहे.

आता क्रिकेटविश्वात सर्वाधिक २३ ट्वेन्टी-२० अर्धशतके कोहलीच्या नावावर झाली आहेत.

यापूर्वी हा विश्वविक्रम रोहितच्या नावावर होता, त्याच्या नावावर २२ अर्धशतके होती.