आज कोहलीने इंस्टाग्रामवर पोस्ट करत निवृत्तीची घोषणा केली. 'माझा कसोटी क्रिकेटमधील प्रवास सुरू होऊन 14 वर्षे झाली. जेव्हा मी पहिल्यांदा टीम इंडियाची टेस्ट कॅप घातली, तेव्हा मला वाटले नव्हते की, हा प्रवास मला खूप काही शिकवून जाईल. कसोटी क्रिकेट हे काहीतरी वेगळे आहे. आता मी या फॉरमॅटला निरोप देत आहे. जड अंतकरणाने मी हा निर्णय घेतोय, पण मला माहित आहे की, हीच योग्य वेळ आहे. मी मनापासून सर्वांचा आभारी आहे. माझ्या कसोटी कारकिर्दीच्या आठवणी नेहमीच माझ्या चेहऱ्यावर हास्य आणतील,' असे विराटने आपल्या पोस्टमध्ये म्हटले.