प्रेमात मिळाला धोका तेव्हा खासगी आयुष्यातील 'तो' व्हिडिओ केला लीक; क्रिकेटर अडकला होता वादात

असं म्हणतात की, प्रेमात आणि युद्धात सगळं काही माफ असते. ते प्रेमच काय ज्यात वेडेपणा नसेल हे सगळे एखाद्या सिनेमात चांगले वाटते. परंतु खऱ्या आयुष्यात प्रत्येक गोष्टीची मर्यादा असते आणि ती मर्यादा पाळणारा माणूस कायम आठवणीत राहतो. श्रीलंकेचा महान क्रिकेटर सनथ जयसूर्या जो एकेकाळी त्याच्या आक्रमक खेळीने अनेक गोलंदाजांचा धुव्वा उडवला. क्रिकेटमध्ये नावलौकिक मिळवलेला जयसूर्या त्याच्या आयुष्यात कायम वादात राहिला. आता त्याच्या आयुष्यातील असा वाद पुढे आला आहे ज्याने त्याचे खासगी जीवन सगळ्यांसमोर आले आहे.

सनथ जयसूर्याचे क्रिकेट करिअर जितके जबरदस्त राहिले तितकेच त्याच्या वैयक्तिक जीवनात चढउतार पाहायला मिळाले. जयसूर्याने ३ लग्न केली परंतु तिन्ही अयशस्वी ठरली. त्याचे पहिले लग्न १९९८ साली एअर श्रीलंकाची ग्राऊंड होस्टेस सुमुदू करुणानायकसोबत झाले. जे १ वर्षातच तुटले.

त्यानंतर २००० साली त्याने एअर होस्टेस संद्रा डिसिल्वासोबत दुसरे लग्न केले. या लग्नातून त्याला ३ मुले झाली. त्यानंतर सनथ जयसूर्या याच्या जीवनात अभिनेत्री मलिका सिरिसेना हिची एन्ट्री झाली. रिपोर्टनुसार, जयसूर्याने मलिकासोबत अफेअरमुळे दुसरी पत्नी संद्रा डिसिल्वा हिला घटस्फोट दिला. फेब्रुवारी २०१२ साली त्याने मलिका सिरिसेना हिच्यासोबत एका मंदिरात गुपचूप लग्न केले. परंतु हे नातेही फार काळ टिकले नाही.

मलिका सिरिसेना हिचे काही काळानंतर जयसूर्याला सोडून एका उद्योगपतीशी लग्न केले. प्रेमात मिळालेल्या या विश्वासघातानंतर जयसूर्यावर गंभीर आरोप लागले आहे. त्याने मलिका सिरिसेनासोबत बनवलेला अतरंगी व्हिडिओ जाणुनबुजून लीक केल्याचा आरोप आहे.

हा कथित व्हिडिओ २०१७ मध्ये व्हॉट्सअपवर आणि अन्य सोशल मीडियात वेगाने व्हायरल झाला होता. मलिका सिरिसेना हिने जयसूर्यावर व्हिडिओ लीक केल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली होती. परंतु जयसूर्याने या आरोपाचे खंडन केले. जयसूर्या याच्या आयुष्यातील हा सर्वात मोठा वाद होता ज्याने त्याच्या क्रिकेट करिअरवर परिणाम झाला. या आरोपामुळे जयसूर्याची प्रतिमा खूप मलिन झाली.

सनथ जयसूर्या याचा आज वाढदिवस, ३० जून १९६९ रोजी श्रीलंकेच्या मटारा शहरात त्याचा जन्म झाला होता. एका सर्वसाधारण कुटुंबातून पुढे येत जयसूर्याने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. १९८९ साली त्याने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पर्दापण केले. १९९६ सालचा वर्ल्डकप त्याच्या आयुष्यातील टर्निंग पाँईट ठरला.

तत्कालीन कॅप्टन अर्जून रणतुंगा याने ओपनर म्हणून त्याला संधी दिली. या निर्णयाने क्रिकेट जगतात क्रांती आली. जयसूर्याने रमेश कालूवितरणासोबत मिळून पावरप्लेचा फायदा घेणे सुरू केले. ज्यामुळे विरोधी टीमची रणनीतीच पूर्ण बदलायची. १९९६ च्या वर्ल्डकपमध्ये जयसूर्याने मोस्ट व्हॅल्यूएबल खिताब पटकावला आणि श्रीलंकेने हा वर्ल्डकप जिंकला. सनथ जयसूर्याच्या याच आक्रमक खेळीमुळे भारतासह अनेक दिग्गजांचे स्वप्न धुळीस मिळाले.

२९ ऑक्टोबर २००० साली शारजाह येथे खेळल्या गेलेल्या चॅम्पियन ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात सनथ जयसूर्याने १८९ रन्सची तुफानी खेळी केली. १६१ चेंडूमध्ये जयसूर्याने २१ चौकार, ४ षटकार मारले. ज्यात श्रीलंकेने २९९ धावांचा मोठा स्कोअर उभा केला. श्रीलंकेने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना भारतीय टीम ५४ धावांतच गुंडाळली गेली. श्रीलंकेने हा सामना २४५ रन्सने जिंकला.

२०११ साली जयसूर्याने जागतिक क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्याने ४४५ एकदिवसीय सामन्यात १३ हजार ४३० धावा केल्या आणि ३२३ विकेट्स घेतल्या. ज्यात १० हजार धावा आणि ३०० विकेट घेणारा तो जगातील पहिला खेळाडू बनला.

२०१९ साली आयसीसीने भ्रष्टाचार विरोधी संहितेचे उल्लंघन करण्यासाठी जयसूर्यावर २ वर्ष बंदी आणली. क्रिकेटच्या मैदानाशिवाय जयसूर्या राजकारणातही सक्रीय होता. २०१० साली संसदेत तो निवडून आला होता. त्यानंतर स्थानिक सरकारमध्ये ग्रामविकास मंत्री म्हणून जयसूर्याने काम सांभाळले होते.