भारताचा धमाकेदार विजय, पाहा फक्त एका क्लिकवर

भारताने बांगलादेशवर एक डाव आणि १३० धावांनी दमदार विजय मिळवला.

मयांक अगरवालने या सामन्यात २४३ धावांची खेळी साकारत विजयात मोलाचा वाटा उचलला.

भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने या सामन्यात भेदक मारा केला. शमीने या सामन्यात एकूण सात बळी मिळवले.

भारताचा फिरकीपटू आर. अश्विनने या सामन्यात एकूण पाच बळी मिळवले.

उपकर्णधार अजिंक्य रहाणेचे शतक यावेळी १४ धावांनी हुकले. अजिंक्यने ८६ धावांची खेळी साकारली.

रवींद्र जडेजानेही दमदार फटकेबाजी करत अर्धशतकी खेळी साकारली.