सामाजिक संस्थांकडून गरजूंना अन्नाची पाकिटे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2020 21:15 IST2020-03-31T21:13:59+5:302020-03-31T21:15:38+5:30
येवला : कोरोनामुळे रोजगार गमावलेल्या कष्टकरी, मजूर, बेघर नागरिकांची उपासमार होऊ नये म्हणून या घटकांसाठी सामाजिक संस्थांच्या माध्यमातून अन्नाची पाकिटे व पाणी उपलब्ध करून दिले आहे.

अन्न पाकिटे वितरित करताना राहुल लोणारी, किरणसिंग परदेशी, योगेश सोनवणे, सुभाष गांगुर्डे, तरंग गुजराथी, भूषण शिनकर, अक्षय तांदळे आदी कार्यकर्ते मास्क, हॅण्डग्लोज घालून आपली सुरक्षा व योग्य अंतर राखून कर्तव्य पार पाडीत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
येवला : कोरोनामुळे रोजगार गमावलेल्या कष्टकरी, मजूर, बेघर नागरिकांची उपासमार होऊ नये म्हणून या घटकांसाठी सामाजिक संस्थांच्या माध्यमातून अन्नाची पाकिटे व पाणी उपलब्ध करून दिले आहे.
तहसीलदार रोहिदास वारूळे यांनी शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांची बैठक घेऊन सामाजिक संस्थांना अन्नदान सहभागाबाबत आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देत यातून येवला कांदा व्यापारी असोसिएशन, माणुसकी फाउण्डेशन व येवला सोशल मीडिया फोरम या तीन संस्थांनी एकत्र येत स्वत: अन्न शिजवून ते पाकिटातून वितरण करण्याची जबाबदारी स्वीकारली. यात कांदा व्यापारी असोसिएशनने शिधा बनविण्याचा संपूर्ण खर्च उचलला असून, त्यांच्याकडील तयार अन्नाची पाकिटे माणुसकी फाउण्डेशन व येवला सोशल मीडिया फोरमचे कार्यकर्ते गरजूंपर्यंत पोहोचवित आहेत. सुमारे दोन महिने हा उपक्र म सातत्याने चालविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. अन्न पाकिटे वितरित करताना राहुल लोणारी, किरणसिंग परदेशी, योगेश सोनवणे, सुभाष गांगुर्डे, तरंग गुजराथी, भूषण शिनकर, अक्षय तांदळे आदी कार्यकर्ते मास्क, हॅण्डग्लोज घालून आपली सुरक्षा व योग्य अंतर राखून कर्तव्य पार पाडीत आहेत.
माणुसकी फाउण्डेशनचे अल्केश कासलीवाल, येवला सोशल मीडिया फोरमचे समन्वयक अविनाश शिंदे या उपक्र माचे नियोजन करीत असून, नागरिकांकडून या संस्था व पदाधिकाऱ्यांना धन्यवाद दिले जात आहेत.