मराठा विद्यार्थ्यांना आरक्षण रद्दचा फटका बसणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:05 AM2021-05-06T04:05:53+5:302021-05-06T04:05:53+5:30

गुणवत्ता असूनही डावलले जाण्याची भीती; एसईबीसी कायम ठेवण्याची मागणी लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मराठा आरक्षणाचा कायदा सर्वोच्च न्यायालयाने ...

Maratha students will be hit by cancellation of reservation! | मराठा विद्यार्थ्यांना आरक्षण रद्दचा फटका बसणार!

मराठा विद्यार्थ्यांना आरक्षण रद्दचा फटका बसणार!

googlenewsNext

गुणवत्ता असूनही डावलले जाण्याची भीती; एसईबीसी कायम ठेवण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मराठा आरक्षणाचा कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्याचा सर्वांत मोठा फटका शैक्षणिक क्षेत्रातील विविध टप्प्यांवर प्रवेश घेणाऱ्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांना बसणार असल्याच्या प्रतिक्रिया या समाजातील विद्यार्थ्यांनी दिल्या. यामुळे पुन्हा एकदा सर्व प्रकारच्या प्रवेश प्रक्रियांमध्ये मराठा समाजाचे विद्यार्थी गुणवत्ता असूनही मागेच राहणार, त्यांच्यावर अन्याय होणार, अखी खंत त्यांनी व्यक्त केली.

मागील वर्षी मराठा आरक्षणाला मिळालेल्या स्थगितीमुळे अकरावी, अभियांत्रिकी, पदवी प्रवेश, आयटीआय प्रवेश अशा सर्व प्रवेश प्रक्रियांना खीळ बसली होती. मात्र आर्थिक मागास प्रवर्गातून (ईडब्ल्यूएस) प्रवेश देऊन या विद्यार्थ्यांना दिलासा देण्यात आला. तरीही सामाजिक, शैक्षणिक मागास वर्गातून (एसईबीसी) प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा फटका बसला. ईडब्ल्यूएसमधून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनीही जागा कमी झाल्याने याबद्दल नापसंती दर्शविली. आता आरक्षणच रद्द करण्यात आल्याने अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत मराठा विद्यार्थ्यांचा निभाव कसा लागणार? गुणवत्ता असूनही आयटीआय, अभियांत्रिकी आणि नामांकित महाविद्यालयातील प्रवेशापासून त्यांना दूरच राहावे लागणार, अशी नाराजी मराठा समाजातील विद्यार्थ्यांमध्ये आहे.

दरम्यान, गेले अनेक महिने आरक्षणाला मिळालेल्या स्थगितीमुळे एमपीएससी परीक्षांचे निकाल आणि पदभरतीमधील नियुक्त्याही रोखून ठेवण्यात आल्या आहेत. आरक्षणाअभावी अनेक उमेदवारांच्या नियुक्त्या गेल्या २ वर्षांपासून रखडल्या आहेत, त्यांची यात काहीच चूक नसताना त्यांना याचा त्रास का, असा प्रश्न एमपीएससी समन्वय समितीचे राजुल कवठेकर यांनी उपस्थित केला.

* हक्कांच्या जागांची गरज

आतापर्यंत विद्यार्थ्यांना आर्थिक मागास प्रवर्गातील जागेमधून अर्ज व प्रवेशाच्या संधीचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला हाेता. मात्र विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्काच्या जागांची गरज असल्याने राज्य सरकारने आरक्षणासाठीच प्रयत्न करणे आवश्यक आहे. मराठा समाजातील विद्यार्थ्यांना थेट एसईबीसी किंवा मग काहीच होत नसेल तर ओबीसीमधील आरक्षणातून जागा उपलब्ध करून आरक्षण द्यावे.

- राहुल कवठेकर, एमपीएससी समन्वय समिती

----------------------

Web Title: Maratha students will be hit by cancellation of reservation!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.