Join us  

'माझ्या मुलांनी पळून जाऊनच लग्न करावं' अंबानींच्या प्री वेडिंगनंतर अभिनेत्रीने मांडलं स्पष्ट मत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2024 1:06 PM

प्री वेडिंग फंक्शन पाहून ट्विंकल खन्नाची अशी आली प्रतिक्रिया

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारची पत्नी आणि अभिनेत्री ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna)  नेहमीच चर्चेत असते. तिच्या अनेक वक्तव्यांमुळे लक्ष वेधलं जातं. ट्विंकल बऱ्याच वर्षांपासून मोठ्या पडद्यावरुन दूर आहे. २००१ सालीच तिने अभिनयाला रामराम केला. ती आता लेखिका म्हणून नावारुपाला आली आहे. नुकतंच तिने एका मुलाखतीत प्री वेडिंग फंक्शनचा राग येत असल्याचं सांगितलं. तसंच आपल्या मुलांनी पळून जाऊन लग्न करावं अशी अजब इच्छा तिने व्यक्त केली.

ट्विंकल खन्नाने नुकतंच टाईम्स ऑफ इंडियाच्या एका कॉलममध्ये बहीण रिंकी खन्नासोबत अंबानींच्या तीन दिवस चाललेल्या प्री वेडिंग फंक्शनवर चर्चा केली. आपल्या मुलांनी पळून डाऊन लग्न करावं अशी तिने इच्छा व्यक्त केली. यामागचं कारणही तिने सांगितलं. ट्विंकल म्हणाली, 'मी माझ्या बहिणीला म्हणाले की बरं झालं आपण आपली आडनावं बदलली नाहीत. आपण खन्ना बहिणीच राहिलो. जर आपण आडनाव बदललं असतं तर पुन्हा खन्ना होण्यासाठी आपल्याला नवऱ्याकडून एनओसी घ्यावी लागली असती.' तेवढ्यात माझी बहिण मला थांबवत म्हणाली, तू नावांबद्दल बोलत आहेस पण त्यासाठी आपल्याला काय तामझाम करावा लागला असता. अंबानींच्या इव्हेंटनंतर तर मोठं उदाहरण सेट झालं आहे.'

मी तिला उत्तर देत म्हणाले, "मी नीता भाभींसारखी नाचू शकत नाही. कोरोनावेळी मी शेवटचं तम्मा तम्मा लोगे वर नाचायचा प्रयत्न केला.  पण कदाचित देवालाही माझ्या स्टेप्स फारच वाईट वाटल्या कारण मी धापकन पडले आणि माझा पायच फ्रॅक्चर झाला. तसंच मी आणि माझे पती रात्री १० नंतर कदाचितच जागे राहू शकतो. तसंच २० पेक्षा जास्त लोकांसाठी डिनर पार्टीचं आयोजन करायचं म्हणजे आम्हाला दोघांनाही टेन्शनच येतं.जर माझ्या मुलांना मला सुखात पाहायचं असेल तर त्यांनी तर सरळ पळून जाऊन लग्न करावं."

टॅग्स :ट्विंकल खन्नाअक्षय कुमारअनंत अंबानीलग्न