Kirti Kulhari : "लग्नाने माझी शांतता हिरावून घेतली, मी माझं नातं वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले पण...";
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 13:17 IST
1 / 9अभिनेत्री किर्ती कुल्हारीने साहिल सहगलसोबत लग्न केलं होतं आणि आता पाच वर्षांनंतर त्यांनी वेगळं होण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. 2 / 9किर्तीने एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं की, 'मी माझं नातं वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले पण त्यात यशस्वी झाली नाही आणि माझं लग्न तुटलं.'3 / 9'माझ्या आयुष्यात साहिलची खूप मोठी भूमिका आहे. हे पण तितकंच खरं आहे की, लग्नाने माझी शांतता हिरावून घेतली होती.'4 / 9'आम्ही वेगळं होण्याचा निर्णय पालकांना आवडला नाही. मी आमचं नातं वाचवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत असं माझ्या आईला वाटत होतं.' 5 / 9'मी आधी एक आई होण्याचा आणि मुलाला जन्म देण्याचा विचार करायची पण आता असं अजिबात नाही.'6 / 9किर्ती कुल्हारीसोबत कास्टिंग काऊचसारख्या घटना देखील घटना घडल्या आहेत पण तिला हा मोठा मुद्दा वाटत नाही. 7 / 9अभिनेत्रीचे वडील ख्याली राम कुल्हारी हे भारतीय नौदलात कमांडर होते आणि आईचं नाव श्रावणी कुल्हारी आहे. तिला एक भाऊही आहे. 8 / 9किर्तीने हिमेश रेशमियासोबत बॅडएस रवि कुमारमध्ये काम केलं आहे. 9 / 9