Join us

संजय कपूरच्या निधनानंतर करिश्माला बसणार मोठा फटका! दर महिन्याला मिळणारी रक्कम होणार बंद?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 12:35 IST

Karisma Kapoor And Sunjay Kapur : करिश्मा कपूरचा एक्स पती आणि उद्योगपती संजय कपूर अब्जावधींचा मालक होता. घटस्फोटानंतर तो दरमहा करिश्माला मोठी रक्कम देत होता. मुलांच्या संगोपनासाठी अभिनेत्रीला लाखो रुपये मिळत होते.

करिश्मा कपूर(Karisma Kapoor)चा एक्स पती संजय कपूर(Sunjay Kapur)चे नुकतेच निधन झाले आहे. वयाच्या ५३ व्या वर्षी संजयने हृदयविकाराच्या झटक्याने जगाचा निरोप घेतला. ज्यामुळे कपूर कुटुंबात तसेच मनोरंजन उद्योग आणि व्यावसायिक जगात शोककळा पसरली आहे. संजय कपूरच्या निधनानंतर अनेक गोष्टी बोलल्या जात आहेत. संजयच्या मृत्यूनंतर, करिश्माशी त्याचा घटस्फोट पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. करिश्मा आणि संजयचा घटस्फोट होऊन बराच काळ लोटला असला तरी, त्याने प्रिया सचदेवशी लग्न करून तो आपल्या आयुष्यात पुढे गेला होता. त्याचवेळी, करिश्मा एकटी आई म्हणून तिच्या मुलांचं संगोपन करत आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, घटस्फोटानंतर संजय कपूर आपल्या मुलांच्या संगोपनासाठी दरमहा करिश्माला मोठी रक्कम देत होता. मात्र, आता रिपोर्टमध्ये म्हटले आहे की संजयच्या मृत्यूनंतर हे सर्व थांबू शकते. अनेक वर्षे कटु नात्यात राहिल्यानंतर संजय आणि करिश्माचा २०१६ मध्ये घटस्फोट झाला. त्यानंतर, करिश्माला दोन्ही मुलांचा ताबा मिळाला आणि संजयला त्यांना भेटण्याची परवानगी देण्यात आली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, घटस्फोट झाल्यावर संजयने खार येथील त्याच्या वडिलांचे घर करिश्माच्या नावावर केले. इतकेच नाही तर संजयने त्याच्या मुलाच्या नावाने १४ कोटींचा बाँड खरेदी केला.

संजयचे मुलांसोबत होते चांगले संबंधमीडिया रिपोर्ट्सनुसार, संजयच्या मृत्यूनंतर, करिश्माला मिळणारी मोठी रक्कम रोखण्यात येईल. मात्र याबद्दल अधिकृतपणे काहीही सांगण्यात आलेले नाही. विशेष म्हणजे करिश्मासोबत घटस्फोट झाल्यानंतरही संजयने त्याच्या मुलांसोबत चांगले संबंध ठेवले आणि त्यांच्यासोबत व्हॅकेशन्सवरही जात होते. रिपोर्ट्सनुसार, संजय समायरा आणि कियानच्या काळजीसाठी दरमहा करिश्माला १० लाख रुपये देत होता. संजय कपूर १०,३०० कोटींचा मालक होता, त्याच्याकडे दिल्ली आणि मुंबई तसेच लंडनमध्ये अनेक मालमत्ता होत्या. रिपोर्टनुसार, घटस्फोटानंतर संजयने करिश्माला पोटगी म्हणून ७० कोटी रुपये दिले होते.

२००३ मध्ये संजय-करिश्माचे झालं होतं लग्नसंजय आणि करिश्माचे २००३ मध्ये मोठ्या थाटामाटात लग्न झाले. पण, लग्नानंतर करिश्माने २०१४ मध्ये न्यायालयात घटस्फोटाची याचिका दाखल केली आणि संजयवर अनेक आरोप केले. घटस्फोटादरम्यान, करिश्माने संजयवर तिला मारहाण करण्याचा आणि त्याच्या मित्रांसोबत झोपण्यासाठी दबाव आणण्याचा आरोप केला. त्याच वेळी, संजयने म्हटले होते की अभिनेत्रीने पैशासाठी त्याच्याशी लग्न केले.

टॅग्स :करिश्मा कपूर