'फॅण्ड्री' (Fandry Movie) सिनेमातून अभिनेत्री राजेश्वरी खरात(Rajeshwari Kharat)ने मराठी सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केले. या सिनेमात तिने साकारलेली शालू रसिकांना खूपच भावली. आजही तिला लोक शालू म्हणून ओळखतात. नुकत्याच एका मुलाखतीतराजेश्वरी खरातने आता तिला वेगळ्या धाटणीची भूमिका करायच्या असल्याचे म्हटले आहे. पैसे कमाविण्यासाठी सिनेइंडस्ट्रीत आलेले नाही. मला छान अभिनेत्री व्हायचे आहे, असेही तिने म्हटले. या मुलाखतीत तिने मराठी कलाविश्वातील गटबाजीवरही आपले मत व्यक्त केले. ग्रुपिझममुळे तिच्या हातातून मराठी मालिका निसटल्याचेही सांगितले.
राजेश्वरी खरातने नुकतेच राजश्री मराठीला मुलाखत दिली. त्यावेळी तिला मराठी इंडस्ट्रीत गटबाजीचा तुला कधी फटका बसला आहे का, असे विचारण्यात आले. त्यावर राजेश्वरी खरात म्हणाली, ''हो सतत बसतो. मला कोणीतीही सिनेपार्श्वभूमी नसल्यामुळे आजही माझे निर्णय मला स्वतःलाच घ्यावे लागतात. मी कोणत्या ग्रुपची मेंबर नाही आहे. बॉलिवूड, साउथच नाही तर मराठीतही गटबाजी आहे. मराठीत ग्रुपिझम खूप जास्त आहे आणि लोक अक्षरशः मला म्हणालेत की, तू पण आमच्या टीमची नंबर हो म्हणजे ग्रुप ग्रुपने काम करत जाऊ. ग्रुपने काम केलं तर मला कुठेतरी चुकल्यासारखे वाटते. ते बरोबर वाटत नाही. अशावेळी तुमचं मानधन कमी केले जाते. आम्ही तुला काम देतो आहे, तर तू थोडंसं इथं एडजस्ट कर, तिथे एडजस्ट कर असे सांगितले जाते. तुझ्याकडे कॉश्च्युम असतील तर आण. पण मी माझे कपडे का आणू. ते माझे काम थोडी आहे. हे ग्रुपिझममध्ये असं घडलं जातं. तसेच ते त्यांच्या लोकांना पुढाकार देतात. वाईट लोक सगळीकडेच आहेत. पण सिनेइंडस्ट्रीला बदनाम करण्यात आलं आहे.''
अशी हातातून निसटली मालिकातिने पुढे म्हटले की, ''मला दोन-तीन मालिकांच्या ऑफर्स आल्या होत्या. त्या ग्रुपिझममुळे माझ्या हातून गेल्या. मला ज्या भूमिकेसाठी विचारलं होतं. त्यासाठी जिला कास्ट केलं होतं. तिचं फिल्मी बॅकग्राउंड होतं. तिचे आई वडिल सिनेइंडस्ट्रीशी संबंधीत होते. दिग्दर्शक आणि प्रॉडक्शनमधल्या काही लोकांनी हिला घ्या ही चांगली आहे असं म्हणत तिची निवड केली. मला एक माणूस सांगत होता की, मी त्यांना सांगत होतो की हा चांगला चेहरा आहे. तिच्यापेक्षा चांगलं काम करू शकेल. पण त्यांनी त्यांचं नाही ऐकलं. हेच ग्रुपिझम आहे. ''