रणवीर सिंग आणि रणबीर कपूर हे बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेते आहेत. दोघांनी बॉलिवूडमध्ये यशस्वी करिअर केलं. रणवीर - रणबीर यांचं स्वतःचं वेगळं फॅन फॉलोईंग आहे. असं म्हटलं जातं की, रणवीर-रणबीरमध्ये एक छुपं युद्ध आहे. दोघांमध्ये एकमेकांसाठी प्रचंड अहंकार आहे. यामध्ये किती खरं आहे? अन् किती खोटं आहे? याचा खुलासा या दोघांचाही जवळचा व्यक्ती करण जोहरने केला आहे. काय म्हणाला, करण जोहर? जाणून घ्या
करण जोहर रणवीर-रणबीरबद्दल काय म्हणाला?
बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत करण जोहरने रणवीर-रणबीरमध्ये एकमेकांविषयी असलेल्या अहंकाराबद्दल भाष्य केलं. करण म्हणाला- "दोघंही एकमेकांना चांगले ओळखतात. दोघांमध्ये कसलाही अहंकार किंवा गर्व नाहीये. दोघांना त्या नजरेने बघण्याचा हा दृष्टीकोन खूप जुना आहे. मी तर त्यांना त्या दृष्टीकोनातून कधी पाहिलं नाही. आणि मला खात्री आहे ते दोघेही एकमेकांना तसे पाहत नसतील. "
"मला आठवतंय, 'ए दिल है मुश्किल' सिनेमा पाहिल्यावर रणवीर माझ्या घरी आला. सिनेमा त्याला कसा वाटला, हे त्याने मला सांगितलं. रणवीरने सांगितलेल्या गोष्टी खूप कमाल होत्या. त्यानंतर रणबीरने मला ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ पाहून त्याची प्रतिक्रिया सांगितली. त्यामुळे एकमेकांविषयी असलेला अहंकार, गर्व या पलीकडे आमची मैत्री आहे. रणबीर आणि रणवीर एकमेकांसोबत वेळ घालवतात. शॉपिंग करतात. वैयक्तिक आयुष्य आणि इतर भावनाही ते एकमेकांसोबत शेअर करत असतात. यापलीकडे दोघांची मैत्री घट्ट आहेठ, असा खुलासा करण जोहरने केला. त्यामुळे रणवीर-रणबीरमध्ये कसलंही वैर नाही, हे स्पष्ट झालंय. रणबीर सध्या 'रामायण' आणि 'लव्ह अँड वॉर'चं शूटिंग करतोय तर रणवीर 'धुरंधर' सिनेमाचं शूटिंग करतोय.