Ravindra Jadeja: ...म्हणून भर सामन्यात रवींद्र जडेजाने बोटावर लावले मलम; बीसीसीआयची महत्वाची माहिती

Ravindra Jadeja: रवींद्र जडेजाने ऑस्ट्रेलियाच्या पाच फलंदाजांना बाद केले. पण आता जडेजाचा तो व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

रवींद्र जडेजा नागपूर कसोटीतील पहिल्या दिवसाचा हिरो ठरला. जडेजाने ऑस्ट्रेलियाच्या पाच फलंदाजांना बाद केले. पण आता जडेजाचा तो व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

व्हिडीओत जडेजा गोलंदाजी करण्याआधी सहकारी मोहम्मद सिराजच्या हाताला हात लावून काहीतरी घेत आहे. नंतर तो स्वतःच्या बोटावर ते घासतो. यावर ऑस्ट्रेलियातील माध्यमांनी आणि माजी दिग्गजांनी प्रश्न उपस्थित केले.

जडेजाच्या या संशयास्पद कृतीमुळे अनेक प्रश्न नेटकऱ्यांकडून उपस्थित केले जात आहेत. एका चाहत्याने सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर करताच ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज टिम पेन याने निशाणा साधत उत्तर दिले, 'मजेदार " !

बीसीसीआयच्या सूत्रांनी मात्र बोटाला दुखापत असल्याने त्यावर उपाय म्हणून जडेजाने मलम लावले, असे स्पष्ट केले. ऑस्ट्रेलिया मीडियाकडून आधीच नागपूरच्या खेळपट्टीवरून टीम इंडियावर आरोप करण्यात येत होते. आता ऑस्ट्रेलिया मीडियाला आयता मुद्दाच हाती लागला आहे.

या व्हायरल व्हिडीओत जडेजा बॉलिंग टाकण्याआधी मोहम्मद सिराज याच्याकडे जातो. सिराजच्या हातावर मलमसदृश पदार्थ असतो. तो पदार्थ जडेजा बोटाने घेतो. जडेजा तो पदार्थ ज्या हाताने बॉल टाकतो त्या हातावरील बोटाला लावला. हा पदार्थ चिकट असल्याचे दिसून येतेय. मात्र जडेजा चेंडूसोबत छेड़छाड केल्याचे म्हटले जात आहे.

व्हीसीएच्या खेळपट्टीवर उसळी आणि वळण नसले, तरी चेंडू हातातून चांगला सुटत होता. चेंडूची दिशा आणि उप्पादेखील अचूक होता. त्यामुळे 'विकेट टू विकेट गोलंदाजी करीत होतो. उसळी नसल्यामुळे त्रिफळाबाद आणि पायचीत करण्याची मी शक्कल शोधून काढली. सुदैवाने तसे घडलेदेखील मी माझ्या कामगिरीवर खूश आहे, असे रवींद्र जडेजाने पाच गडी बाद केल्यानंतर सांगितले.

खेळपट्टीने आम्हाला फसविले, अशी कबुली ऑस्ट्रेलियाचा फलंदाज पीटर हैंड्सकोम्ब याने पहिल्या दिवशी खेळ आटोपल्यानंतर दिली. या खेळपट्टीवर फिरकीचा बोलबाला' असेल याची चर्चा होती. नेमके तेच घडल्यामुळे ऑस्ट्रेलियाची घोर निराशा झाली. पाहुण्या संघातील अनेक फलंदाज खराब फटके खेळून बाद झाले. फलंदाजी करणे सोपे नव्हते. खेळपट्टीमुळे आमच्या मनात धाकधूक होती, असे तो म्हणाला.

गुडघ्याच्या जखमेमुळे पाच महिने बाहेर राहिलेल्या अष्टपैलू रवींद्र जडेजाने यशस्वी पुनरागमन करीत कारकिर्दीत ११ व्यांदा अर्धा संघ बाद करण्याची किमया साधली. त्याच्या साहसी कामगिरीमुळे भारताने गुरुवारी सुरू झालेल्या बॉर्डर-गावसकर टॉफी चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात पहिल्याच दिवशी ऑस्ट्रेलियाचा धावांत खुर्दा उडविला. यानंतर दिवसअखेर २४ घटकांत १ बाद ७७ धावा केल्या.

अपेक्षेप्रमाणे विदर्भ क्रिकेट संघटनेच्या जामठा स्टेडियमवर फिरकीपटूंनी वर्चस्व गाजविले. आज एकूण ११ गडी बाद झाले. त्यात फिरकीपटूंनी नऊ फलंदाजांना माघारी धाडले. जडेजाने ४७ धावांत पाच तर रविचंद्रन अश्विनने ४२ धावांत तीन गडी बाद केले. ऑस्ट्रेलियाकडून ऑफ ब्रेक टॉड मर्फी याने भारताचा उपकर्णधार लोकेश राहुल (२०) याचा बळी घेतला. रोहित ५६ धावांवर नाबाद असून, दुसऱ्या टोकावर असलेल्या 'नाईट वॉचमन' अश्विनने अद्याप खाते उघडलेले नाही. भारत शंभर धावांनी मागे असून, नऊ फलंदाज शिल्लक आहेत.