'पाकिस्तान भारताशी फायनल खेळेल' म्हणणाऱ्या कोचची श्रीसंतने लायकीच काढली, म्हणाला...

"पाकिस्तानच्या टीमला हरवण्यासाठी आमच्या भारताची...", वाचा श्रीसंतचं विधान

India vs Pakistan : भारतीय संघाने यंदाच्या विश्वचषकात अजिंक्य राहण्यात आतापर्यंत यश मिळवलं आहे. पहिल्या चारही सामन्यात भारताने दणदणीत विजय मिळवला आहे.

ऑस्ट्रेलिया सारख्या सर्वाधिक वेळा विश्वविजेतेपद जिंकलेल्या संघाला पराभूत करून भारताने स्पर्धेची सुरूवात केली. त्यानंतर अफगाणिस्तानलाही धूळ चारली.

भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान टीम इंडियाला टक्कर देईल असे वाटत होते. पण भारताने पाकिस्तानला एकतर्फी पराभूत केले. पाकिस्तानच्या पराभवानंतर माजी पाक खेळाडूही त्यांच्यावर संतापल्याचे दिसले.

याच दरम्यान, पाकिस्तानचे प्रशिक्षक मिकी आर्थर यांनी एक भविष्यवाणी केली. भारतीय संघ फायनलला पोहोचेल असे ते म्हणाले. त्यासोबतच, भारत-पाकिस्तान यांच्यात फायनलचा सामना रंगेल असाही अंदाज त्यांनी व्यक्त केला.

मिकी आर्थर यांच्या या दाव्यावर भारताचा माजी गोलंदाज एस श्रीसंत याने सडेतोड प्रत्युत्तर दिले. भारताची C टीम देखील पाकिस्तानच्या मूळ टीमला सहज पराभूत करू शकेल, अशा शब्दांत त्याने पाकची खिल्ली उडवली.