Join us  

माजी कसोटीपटू राजिंदर पाल यांचे निधन

भारताचे माजी कसोटीपटू राजिंदर पाल यांचे डेहराडून येथे त्यांच्या निवासस्थानी निधन झाले आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 12:22 AM

Open in App

नवी दिल्ली - भारताचे माजी कसोटीपटू राजिंदर पाल यांचे डेहराडून येथे त्यांच्या निवासस्थानी निधन झाले आहे. माजी प्रथम श्रेणी क्रिकेटपटू व राजिंदर यांचे भाऊ रविंदर पाल म्हणाले की, ‘माझे मोठे भाऊ राजिंदर यांचे बुधवारी डेहराडून येथे निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व एक मुलगी आहे.’वेगवान गोलंदाज असलेले पाल यांनी आपला एकमेव कसोटी सामना १९६३-६४ च्या मोसमात मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडिअमवर इंग्लंडविरुद्ध खेळला होता. त्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ९८ सामन्यात ३३७ गडी बाद केले असून २३ वेळा पाच किंवा त्याहून अधिक गडी बाद केले आहेत.

टॅग्स :क्रिकेटबातम्या