Join us  

आफ्रिका दौ-यात भारत तीनच कसोटी खेळणार, सहा एकदिवसीय आणि तीन टी-२० सामनेही होणार

पुढील वर्षी ५ जानेवारीपासून सुरू होत असलेल्या द.आफ्रिका दौ-यात भारतीय संघ चार ऐवजी तीन कसोटी सामने खेळणार आहे. या दौ-यात सहा एकदिवसीय आणि तीन टी-२० सामनेही खेळविले जातील. तीन सामन्यांची ही मालिका ‘म. गांधी-नेल्सन मंडेला चषक’ या नावाने प्रसिद्ध आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 4:19 AM

Open in App

नवी दिल्ली : पुढील वर्षी ५ जानेवारीपासून सुरू होत असलेल्या द. आफ्रिका दौ-यात भारतीय संघ चार ऐवजी तीन कसोटी सामने खेळणार आहे. या दौ-यात सहा एकदिवसीय आणि तीन टी-२० सामनेही खेळविले जातील. तीन सामन्यांची ही मालिका ‘म. गांधी-नेल्सन मंडेला चषक’ या नावाने प्रसिद्ध आहे.सामन्यांच्या तारखा आणि स्थळ अद्याप निश्चित झालेले नाहीत. भारताला सुरुवातीला या दौ-यात चार कसोटी सामने खेळायचे होते. पण श्रीलंका संघाविरुद्ध भारताला मायदेशात डिसेंबर अखेरपर्यंत मालिका खेळायची आहे.