Maharashtra Election 2019 : चार उमेदवारांना निवडणूक आयोगाची नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 05:01 IST2019-10-15T05:00:00+5:302019-10-15T05:01:08+5:30
राज्यभर २१ सप्टेंबरपासून आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने सोशल मीडियावर जाहिरात करण्यापूर्वी माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समिती तथा जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडून प्रमाणीकरण करणे बंधनकारक केले होते. परंतु बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातील चार उमेदवारांकडून प्रमाणीकरण न करता १३ ऑक्टोबर २०१९ रोजी सोशल मीडिया फेसबुक अकाउंटवरून निवडणुकीचा प्रचार करून आदर्श आचारसंहिता भंग केल्याचे दिसून आले.

Maharashtra Election 2019 : चार उमेदवारांना निवडणूक आयोगाची नोटीस
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीमार्फत उमेदवारांना निवडणुकीदरम्यान वापरण्यात येणाऱ्या प्रचार साहित्याचे प्रमाणीकरण करणे बंधनकारक केले आहे. प्रमाणीकरण न करता सोशल मीडिया तसेच फेसबुकच्या माध्यमातून प्रचार करणाºया चार उमेदवारांना बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी महादेव खेडेकर यांनी सोमवारी नोटीस बजावली आहे.
राज्यभर २१ सप्टेंबरपासून आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने सोशल मीडियावर जाहिरात करण्यापूर्वी माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समिती तथा जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडून प्रमाणीकरण करणे बंधनकारक केले होते. परंतु बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातील चार उमेदवारांकडून प्रमाणीकरण न करता १३ ऑक्टोबर २०१९ रोजी सोशल मीडिया फेसबुक अकाउंटवरून निवडणुकीचा प्रचार करून आदर्श आचारसंहिता भंग केल्याचे दिसून आले. त्या कारणाने सोशल मीडिया फेसबुक अकाउंटवरून निवडणुकीच्या प्रचार करून आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याने उमेदवारावर फौजदारी गुन्हा का दाखल करण्यात येऊ नये. तसेच त्याबाबत उमेदवाराच्या खर्चात समाविष्ट का करण्यात येऊ नये. याबाबतचे लेखी स्पष्टीकरण उमेदवारांनी द्यावे. अन्यथा कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट निर्देश निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी संबंधित उमेदवारांनी दिले आहेत.
सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार करावयाचा असल्यास संबंधित उमेदवाराचे फेसबुक अकाउंट माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीमार्फत प्रमाणित करणे आवश्यक आहे. अनेक उमेदवारांनी स्वत:चे सोशल मीडिया अकाऊंटची माहिती अजूनही एमसीएमसी कमिटीला सादर केलेली नाही. जाहिरातीचा प्रसार पूर्वपरवानगीशिवाय करता येत नाही. पूर्वपरवानगी घेण्याकरिता उमेदवारांनी संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी याकडे तसा रितसर अर्ज दाखल करावा. यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय एमसीएमसी समितीचे नोडल अधिकारी नियुक्त केली असून त्यामध्ये राजुरा विधानसभा मतदारसंघाकरीता मुख्याधिकारी अर्शिया जुही व उपविभागीय वनाधिकारी अमोल गरकल, चंद्रपूर विधानसभा मतदारसंघाकरिता चंद्रपूर मनपा जनसंपर्क अधिकारी युधिष्ठीर रैच, बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाकरिता कनिष्ठ प्रशासकीय अधिकारी किरण वाढई व सहायक प्रशासकीय अधिकारी नितीन फुलझेले, ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघाकरिता बालविकास प्रकल्प अधिकारी कुणाल धुमाळ, चिमूर विधानसभा मतदारसंघाकरिता नायब तहसीलदार संदीप बांगडे, वरोरा विधानसभा मतदारसंघाकरिता तहसीलदार महेश शितोडे यांचा समावेश आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील संपूर्ण विधानसभा क्षेत्रातील उमेदवारांनी संबंधित अधिकाºयांकडे पूर्वपरवानगीसाठी अर्ज सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.